मुख्य सामग्रीवर वगळा

वँग यी भेटले... आता पुढे काय?

 बऱ्याच खटाटोपीनंतर अपेक्षित असलेली, पण आधी न ठरलेली अशी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची प्रस्तावित ‘भारत भेट’ एकदाची झाली. असा उल्लेख करायचं कारण म्हणजे वँग यी यांची भारत भेट ही आधी ठरलेली नव्हती, पण शक्यता वर्तवण्यात येत होती की दक्षिण आशिया भेटीवर असलेले वँग यी हे भारत भेटीवर येतील. दोन्हीही देशांनी म्हणजे, भारत आणि चीनने या बद्दल अधिकृतपणे न बोलणच  पसंत केलं. याला एक पार्श्वभूमी आहे ती म्हणजे २०२० च्या गलवान संघर्षाची... आतापर्यन्त गलवान संघर्षानंतर जवळपास १५ वेळा भारत आणि चीन यांच्या दरम्यान लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणजे कॉर्प्स कमांडर्स स्तरावर बैठकी झाल्या होत्या. त्यात प्रगती झाली नाही. आणि म्हणून सैनिकी बैठकीपेक्षा, राजकीय बैठकांमधून काही फलनिष्पत्ती होते का, याचा  ऊहापोह करायचा होता आणि म्हणूनच या बैठक झाल्या. नेमकं सांगायचं म्हणजे वँग यी हे दक्षिण आशियाच्या दौऱ्यावर होते. म्हणजे ते पाकिस्तान आणि अफगानिस्तान इथल्या बैठका आटपून भारत भेटीवर आले होते.

पण वँग यी यांचं भारत भेटीवर येण्याचं कारण काय? थेट बोलायचं झाल्यास भारत आणि चीन द्विपक्षीय संबंध सुधारणे आणि त्यांना सामान्य स्तरावर आणणे हा या बैठकी मागचा मूळ हेतु होता. फार महत्वाच्या घडामोडी या बैठकीत घड्ल्या. म्हणजे सुरवातीला चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी हे भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना भेटले. या बैठकीत डोवाल यांनी यी यांना भारत चीन सीमारेषेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने प्रयत्न करावेत असं सांगितलं. जो पर्यन्त चीन आपले सैनिक LAC वरुन मागे घेत नाही आणि चीनी सैनिक त्यांच्या आधीच्या ठिकाणावर जात नाहीत तो पर्यन्त भारत चीन शांतता वार्ता सफल होऊ शकत नाहीत असं सांगितलं. यी यांनी दुसरी भेट घेतली ती होती भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची... जयशंकर यांनीसुद्धा वँग यी यांना सांगितलं की भारत चीन सीमेवर शांतता प्रस्थापित होण्यासाठी चीनने आपले सैनिक तिथून मागे घेणं गरजेचं आहे. यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर, भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष शृंगला आणि परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेतली आणि त्यात हे ठसवून सांगितलं की भारताला शांतता हवी आहे पण चीनने काही गोष्टींची पूर्तता केल्यासच आपल्याला पुढे जाता येईल.

जयशंकर यांनी परिषदेत भारताचे चीन बरोबर संबंध हे ‘वर्क इंन प्रोग्रेस’ आहेत असं सांगितलं. म्हणजे संबंध सुधारण्याच काम चालू आहे, पण पूर्ण यश आलं नाही अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे, असा अर्थ त्यातून निर्देशित होतो. तसंच जयशंकर यांनी हे ठासून सांगितलं की भारत चीन संबंध सद्य परिस्थितीत नॉर्मल नाहीत.  वँग यी यांच्या भेटीमागे अजूनसुद्धा काही कारणं होती. ती म्हणजे सध्याच्या रशिया- यूक्रेन युद्धात चीनच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा. तसंच भारताने अमेरिकेच्या दबावाखाली येऊ नये. चीन सरकारच्या मुखपत्रात म्हणजे ‘ग्लोबल टाइम्स’ मधल्या लेखाने  तर भारताने रशिया-यूक्रेन युद्धात तटस्थ भूमिका घेतल्याबद्दल भारताचं अभिनंदन करून चीन मोकळा झाला. तसंच परत एकदा हिन्दी चीनी भाई भाई ची रि ओढली होती. चीनने भारताच्या भूमिकेची स्तुति केली. आणि भारत चीन यांनी एकत्र येण्याचा आणि एकत्र काम करण्याचा सल्ला दिला. वँग यी यांच्या भेटीचं अजून एक कारण म्हणजे जी-२०, ब्रिक्स आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन यांचं यजमान पद चिनकडे आहे म्हणजे चीनमध्ये या तीन गटांच्या बैठका होणार आहेत, यासाठी श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षपणे या तीनही बैठकाना उपस्थित राहावे यासाठी खास जिनपिंग यांचा खलिता घेऊनच ते आले होते.

यादरम्यान वँग यी यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल याना चीन भेटीचे निमंत्रण दिले. एक महत्वाची बाब इथे आवर्जून नमूद करावीशी वाटते ती म्हणजे, वँग यी यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटीसाठी वेळ मागितली होती. पण मोदी यांनी यी यांची भेट घेतली नाही. याबद्दल भारताने बोलण्याचे टाळले. याचा अर्थ सरळ आहे, मोदींनी यी यांची भेट घेण्याचं टाळलं... भारत ‘गलवान’ प्रसंग विसरलेला नाही, चीनने विश्वासघात केला... पण हा पूर्वीचा भारत नाही, हे कळण्यासाठी मोदी यांनी भेट नाकारणं म्हणजे एक मोठं डिप्लोमॅटीक पाऊल आहे. हे ठळकपणे इथे जाणवतं. यातून चीनला योग्य तो संदेश जाईल... भारताने भक्कम भूमिका घेतली आहे याचं हे द्योतक आहे इतकंच म्हणावस वाटतं.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...