मुख्य सामग्रीवर वगळा

वँग यी यांची प्रस्तावित भारत भेट... काय होणार?

 चीन... उद्याची महासत्ता! सध्याच्या घडीला जागतिक राजकारणात प्रभाव टाकणारा एक महत्वाचा देश... म्हणून चीनकडे पाहता येईल. मागच्याच दशकात चीन महासत्ता होण्याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. २१ व्या शतकात चीन एक ताकदवान आशियाई देश म्हणून पुढे येईल असं दिसत होतं. चीनने त्याची सैनिकी ताकद वाढवली. त्याच बरोबर आर्थिक ताकदसुद्धा वाढवली. येत्या काही वर्षात चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजमितीला चीनची लोकसंख्या १४० अब्ज इतकी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेचा विचार करायचा झाल्यास सगळ्यात ज्यास्त वस्तूंची आणि सेवांची निर्यात करणारा देश म्हणून चीनचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. ही झाली चीनची एक बाजू... पण जागतिक समूहाची चीनबद्दल असलेली विश्वासार्हता फारशी चांगली नाही. याला अनेक कारणं आहेत. चीनची सीमा एकूण १४ देशांबरोबर विभागलेली आहे. किलोमीटरच्या स्वरूपात सांगायचं झाल्यास चीनची २२,४५७ किलोमीटरची सीमा इतर देशांबरोबर आहे. चीनचे जवळपास बऱ्याचश्या देशांबरोबर सीमावाद चालू आहेत. यात भारताचाही समावेश होतो. सध्याच्या घडीला भारत-चीन संबंध बिघडले आहेत. याचं कारण वादग्रस्त अश्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कर आणि चीनी लष्कर यांच्यात २०२० साली आमने सामने झालेल्या चकमकीनंतर सगळं चित्रच बदललं आहे. याच पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी हे या महिन्यात (मार्च २०२२) शेवटच्या आठवडयात भारतभेटीवर येत आहेत.

गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाच्या वेळी भारतीय लष्कराचे अधिकारी आणि जवान असे मिळून २० जण हूतात्मा झाले होते. यात चीनचेसुद्धा अनधिकृत स्त्रोतानुसार एकूण ४०-४५ सैनिक मारले गेले होते. चीन खरी आकडेवाडी लपवत असला तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाच्या एका  वर्तमानपत्रानुसार चीनचे ४० च्या जवळपास अधिकारी आणि सैनिक मारले गेले आहेत. हे सगळं पाहता २०२० नंतर पहिल्यांदाच चीनचे वरिष्ठ मुत्सद्दी त्यांचे परराष्ट्र मंत्री वँग यी भारत भेटीवर येत आहे. त्यामुळे या त्यांच्या भारतभेटीला महत्व आहे. गलवान संघर्ष झाल्यानंतर एकूण १५ वेळा चीन आणि भारत यांच्यामध्ये कॉर्प्स कमांडर स्तरावर (लष्करी अधिकारी) बैठकी झाल्या आहेत. पण सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. आता मंत्री स्तरावर ही पहिल्यानदाच  भेट होत आहे.

लाइन ऑफ अॅकचूअल कंट्रोल (LAC) वरुन झालेल्या बैठका या मिलिटरी स्तरावर होत्या, त्या आता डिप्लोमॅटीक स्तरावर होणार आहेत आणि कूटनीतीद्वारे बैठका होऊन त्यातून ठोस स्वरूपात काही निष्पन्न होऊ शकतं, अशी परिस्थिती आज आहे. भारताने आपला मुद्दा चीनसमोर अत्यंत स्पष्ट शब्दात मांडला आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी याधीच हे स्पष्ट केलं आहे की चीनने जर LAC बदलायचा प्रयत्न केला तर भारत त्याला कदाचितही  मान्य करणार नाही.

आता जर प्राप्त परिस्थिती पाहिल्यास चीनने नरमाईची भूमिका घेतली आहे असं दिसतय. वांग  यी यांनी या संबंधात एक स्टेटमेंट केलं आहे. ते म्हणतात, भारत आणि चीनने एकमेकांची ऊर्जा खर्च करण्यापेक्षा (म्हणजे भांडण्यापेक्षा)  एकत्र येऊन आपापली उदिष्ट साध्य करावीत. या स्टेटमेंटला महत्व आहे. यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण आतापर्यन्त चीनचा असा सुर नव्हता. चीनला हे पक्क माहिती आहे की भारत हा आता १९६२ ला होता तसा राहिला नाही. भारताने मिलिटरी माइट (सैन्यदलांची क्षमता) दाखवली आहे, आणि ती दुसऱ्या देशांवर युद्ध लादण्यासाठी नसून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आहे. आर्थिक विकास, जी डी पी चा चढता दर, जीवनमान उंचावणे, दरडोई उत्पन्नात वाढ, इत्यादी आर्थिक निर्देशकांनुसार एक सशक्त अर्थव्यवस्थेकडे भारत प्रयाण करतो आहे. स्थिर सरकार, बदललेली सकारात्मक राजकीय परिस्थिती या सर्व बाबींमुळे एक सशक्त भारत पुढे वाटचाल करत आहे.

चीनवर पटकन विश्वास ठेवणं अवघड आहे. चीन बोलतो एक आणि करतो दुसरं... चीन जरी म्हणत असला की भारत चीन संबंध सुधारायला पाहिजे, पण चीनने सीमेवर तैनात केलेले सैनिक मागे घेतले नाहीत. तसंच ३८,००० स्क्वेअर किलोमीटरचाभूभाग अनधिकृतपणे हस्तगत केला आहे, मग याचा अर्थ काय समजायचा? चीनबाबत संपूर्ण अनभिज्ञ राहून काहीही न करणे हीसुद्धा एक धोकादायक बाब आहे. चीनने मध्यंतरी आण्विक, रासायनिक आणि जैवीक शस्त्रांच्या संदर्भात तिबेटमध्ये लष्करी कवायती केल्या. हा सुद्धा भारताला इशाराच आहे की काय असं वाटावं. भारताने चीनशी कूटनीतीद्वारे चर्चा कराव्यात, त्याचबरोबर सजग रहावं.

शेवटी एक मुद्दा लक्षात घ्यावा, जो ताकदवान आहे त्यालाच जग नमस्कार करतं, आता पर्यन्त चीन अश्या प्रकारे ताकद दाखवत होता... पण गलवान घडलं आणि चीनला लक्षात आलं की भारताबरोबर चर्चा करूनच सीमा वादावर मार्ग निघू शकतो. (इथे कुठेही भारत सर्वशक्तिमान आहे हे सांगण्याचा हेतु नाही, तसंच भारत महासत्ता आहे अश्या पण पोकळ वल्गना करायचा हेतु नाही, पण सत्य परिस्थिती तर अशीच आहे.) त्या शिवाय वँग यीअश्या पद्धतीचं स्टेटमेंट करू शकत नाहीत. शी जिनपिंग यांच्या मनात काय चालले आहे हे समजू शकत नाही, पण भारताची वाढलेली ताकद, जगभरात अनिवासी भारतीयांची वाढलेली संख्या, आर्थिक आणि लष्करी ताकद या अनुषंगाने वँग यी यांच्या भारत भेटीकडे पहावे लागेल.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...