मुख्य सामग्रीवर वगळा

या कारणामुळे दिली उत्तर कोरियाने पाकिस्तानला ताकीद!

 तसे अगदी कुख्यात कारणांसाठी प्रसिद्ध असलेले दोन देश म्हणजे उत्तर कोरिया आणि पाकिस्तान... दोन्हीही देश एकमेकांपेक्षा कमी नाही. दोन्हीही देश अण्वस्त्रधारी... ! पाकिस्तान आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये घनिष्ट संबंध प्रस्थापित झाले ते ‘७० च्या दशकात. समाजवादी देशांबरोबर युती करण्यासाठी म्हणून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फीकार भुट्टो हे उत्तर कोरियाच्या अधिकृत दौऱ्यावर गेले होते. पाकिस्तान – उत्तर कोरिया संबंध हे एका वेगळ्याच कारणामुळे दृढ झाले ते म्हणजे उत्तर कोरियाने पाकिस्तानला अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवले तेंव्हा. इराण - इराक युदधमद्धे उत्तर कोरिया आणि पाकिस्तानने इराणला पाठिंबा दिला होता. हा झाला इतिहास... ! पण वर्तमानात तर उत्तर कोरिया हा पाकिस्तानवर एका वेगळ्याच कारणासाठी नाखुश आहे. ते कारण म्हणजे दारू... इथे तर असं म्हणण्याला जागा आहे की एकविसाव्या शतकात केवळ दारुमुळे दोन देशांचे संबंध बिघडू शकतात असं हे पहिलच उदाहरण आहे. तुम्हाला हे सगळं वाचल्यानंतर गंमत वाटेल पण हे असं घडलं आहे.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तान यांचे डिप्लोमॅटीक लेव्हलवर संबंध आहेत. इस्लामाबाद इथे उत्तर कोरियाचा दूतावास आहे तर प्योंगयंगमध्ये पाकिस्तानचा दूतावास आहे. असे हे राजनईक स्तरावर संबंध आहेत. मागच्या काही वर्षात घडलेल्या घटनांमुळे उत्तर कोरियाबरोबरचे पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. त्यात आता नवीन भर पडली आहे. ७ मार्च २०२२ रोजी, पाकिस्तानच्या इस्लामाबाद इथे असलेल्या उत्तर कोरियाच्या दूतावासावर पाकिस्तानी पोलिसानी छापे टाकले. कारण काय तर, उत्तर कोरियन अधिकारी पाकिस्तानमध्ये दारू स्मगल करत होते, अनैतिकदृष्ट्या दारू आणत होते. पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यानी उत्तर कोरियन दुतावासातील अधिकाऱ्याना दमदाटी करून, गुन्हा नोंदवून, त्यांना हातकड्या घालून चौकशी केली. बंदुकीचासुद्धा धाक दाखवला.

२०१६ आणि २०१७ ला अश्याच काहिशा घटना घडल्या होत्या. १० पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यानी उत्तर कोरियाच्या पाकिस्तानमधल्या, इस्लामाबाद मधल्या राजदूताचं घर फोडून, अनधिकृतरीत्या आत प्रवेश करून राजदूतला पकडलं तसंच त्याच्या पत्नीला दम दिला, धाक दाखवला, छळ केला आणि चौकशी केली. याचं कारण देण्यात आलं की या राजदूताने अनधिकृतरित्या दारू पाकिस्तानमध्ये आयात केली होती म्हणून.

७ मार्च २०२२ ला जी घटना घडली, म्हणजे पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्यानी जे छापे टाकले त्यामागे जे कारण देण्यात आला ते सरासर खोटं होतं, असं नंतर लक्षात आलं. म्हणजे पाकिस्तानी सूत्राना टीप मिळाली होती की उत्तर कोरियाच्या दुतावासात अगदी भरपूर प्रमाणात दारू अनधिकृतरित्या आणली आहे... पण ही माहिती खोटी निघाली. यावर पाकिस्तानचा अंतरिम मंत्री रशीद खान याने घडलेल्या प्रसंगाबाबत माफी मागितली. आणि मान्य केलं की काहीतरी चुकीची बातमी, टीप पाकिस्तानी सूत्राना मिळाली होती. यावर उत्तर कोरियाच्या दुतावासाने एक पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं की ज्या पाकिस्तानी अधिकाऱ्यानी हे सत्र चालवलं म्हणजे चौकशी केली, धाक दाखवला त्याबद्दल त्यांनी बिनशर्त माफी मागावी, त्यांना निलंबित करण्यात यावं आणि उत्तर कोरियाचा इस्लामाबाद इथला दूतावास ही सर्वस्वी उत्तर कोरिया सरकारची अधिकृत जागा आहे, तसंच ती जागा स्वतंत्र आहे, यावर अश्या पद्धतीने पाकिस्तानी अधिकारी प्रवेश करू शकत नाहीत. उत्तर कोरियाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, तसंच पाकिस्तानला ताकीद दिली की अश्या पद्धतीने पाकिस्तान यांच्याशी वागू शकत नाही. हा ‘व्हिएन्ना कंनव्हेनशनचा’ सरळ सरळ भंग आहे, आणि यासाठी उत्तर कोरिया दाद मागेल.

गोष्ट इथेच थांबत नाही... आता तर कहानी मे ट्विस्ट म्हणजे या प्रकरणाबद्दलची धक्कादायक बाब समोर आली. त्यानुसार पाकिस्तानी पोलिस अधिकाऱ्याना उत्तर कोरियाच्या दूतावसावर छापे टाकून, तिथून जर दारू निघाली तर ती स्वतःकडे  घेऊन खुल्या बाजारात त्याची विक्री करायची होती, अन त्यातून पैसे कमवायचे होते... म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन म्हणून पोलिस अधिकारी अश्या पद्धतीने थेट दूतावसावर छापे टाकत होते.

या घडलेल्या सर्व प्रकरणामुळे पाकिस्तानची उरली सुरली विश्वासार्हता संपुष्टात आली, आणि जागतिक माध्यमांसमोर पाकिस्तानचं नाक कापलं गेलं. शेवटी उत्तर कोरियासारख्या मित्रदेशाने पाकिस्तानला ताकीद दिली, यावर पाकिस्तानने विचार करावा.

 

-निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...