आज जग खूप जवळ आलं आहे. ज्या गोष्टी आधी ऐशोराम म्हणून गणल्या जात होत्या, त्या आज सामान्य, मध्यमवर्गीय माणसांच्या कह्यात आल्या आहेत. विमान प्रवास हा त्यातलाच एक भाग. पूर्वी विमान प्रवास हे एक स्वप्न होतं किंवा ती अशक्य गोष्ट वाटायची. जागतिकीकरणाच्या प्रवाहात आज अनेक गोष्टी सामान्य माणसांपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. याचंच फलित म्हणजे भौतिक सुखाच्या गोष्टी आज सगळ्याना परवडणाऱ्या झाल्या आहेत. इथे आपण महासत्ता म्हणून अमेरिकेचं उदाहरण घेऊ शकतो. एक गमतीचा भाग म्हणून पाहिल्यास अमेरिकेमध्ये लोक बस आणि रेलवेपेक्षा विमानाने देशांतर्गत प्रवास करतात. आपल्याला ज्या सोयीस्कररीत्या बस प्रवास करता येतो, तेवढाच किंवा त्याच्या कितीतरी पटीने अधिक आरामात लोक विमानाने प्रवास करतात. अमेरिकेप्रमाणे भारतातसुद्धा असं होऊ शकतं, हे शक्य आहे. त्याला थोडा काळ जाईल. विमान प्रवास हा सुरक्षित आहे हे जेंव्हा लक्षात येईल आणि लोकांच्या हातात पैसा येईल तेंव्हा भारतातसुद्धा हे शक्य होईल. पण याचा अर्थ विमान दुर्घटना घडू शकत नाहीत असाही नाही. अशीच एक विमान प्रवासाच्या इतिहासात चक्रावून टाकणारी घटना घडली. मलेशियन एअरलाइन्सचं ३७० विमान (एम एच ३७०) हे अचानक आपला नियोजित मार्ग बदलून उलट्या दिशेला येऊन नाहीस झालं. आतापर्यंतच्या विमान प्रवासाच्या इतिहासात अश्या घटना घडल्या नाहीत.
एम
एच ३७० हे मलेशियन एअरलाइन्सचं विमान क्वालालंपूरहून बिजींगला निघालं होतं. हे
विमान बोईंग ७७७ जातीचं होतं. यात केबिन क्रू आणि प्रवासी धरून एकूण २३९ जण होते. यापैकी
२२७ प्रवासी होते तर १२ क्रू मेंबर्स होते. तसच या विमानात १३ वेगवेगळ्या देशांचे
प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये चीनी प्रवासी ज्यास्त होते. तसंच मलेशियाचे
सुद्धा बरेच नागरिक प्रवास करत होते. अजून एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे यात पाच
भारतीय प्रवासी होते. विमान निघण्याची तारीख होती ८ मार्च २०१४... ! स्थानिक
वेळेनुसार एम एच ३७० ने बरोबर १२.४१ वाजता टेक ऑफ केलं. साधारण ०१.०१ ला विमान ३५०००
फुट उंचीवर होतं. Aircraft Communication Addressing And Reporting System ने (या प्रणाली नुसार उपग्रह
किंवा रेडियो सेटने विमान आणि ग्राऊंड स्टेशन्स यांच्यामध्ये संपर्क प्रस्थापित
केला जातो... विमान आणि ग्राऊंड स्टेशन्स यांच्यामध्ये छोट्या संदेशांची देवाण
घेवाण या प्रणालीद्वारे होते.) विमानाच्या सद्य स्थितीबद्दल असलेले शेवटचे
ट्रान्समिशन ०१.०७ ला केलं. यानंतर ही प्रणाली स्विच ऑफ करण्यात आली. केबिन क्रू
चं शेवटचं बोलणं ०१.१९ ला झालं. यानंतर ०१.२१ ला ज्या ट्रान्सपोंडरवरुन विमानाचं एअर
ट्रॅफिक कंट्रोलशी बोलणं झालं तो बंद करण्यात आला. असं जरी असलं तरीसुद्धा मलेशियन
मिलिटरी रडारवर ०२.२२ पर्यन्त विमान ट्रॅक केलं जात होतं. यावेळी ते अंदमानच्या
समुद्रावर उडत होतं.
हा सगळा
घटनाक्रम या विमानाच्या संदर्भात लक्षात येईल. पण असं अचानकपणे आणि इतक्या जलद
गतीने हे सगळं कसं काय घडलं, नक्की काय झालं? विमान विरुद्ध दिशेने का उडालं ? तसंच
ते हायजॅक केलं गेलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनही सापडलेली नाहीत
आणि मिळालीसुद्धा नाहीत. २४ मार्च २०१४ ला मलेशियाचे प्रधानमंत्री नजीब रझाक यांनी
ब्रिटिश एजन्सीचा हवाला देत सांगितलं की एम एच ३७० विमान हिंद महासागरात दक्षिण
पश्चिम ऑस्ट्रेलिया पासून जवळपास २५०० किलोमीटर अंतरावर क्रॅश झालं. या विमानाचे
अवशेष २०१५ मध्ये पाहिल्यांदा हिंद महासागरात एका फ्रेंच बेटाजवळ सापडल्याचा दावा
केला गेला.
विमान
क्रॅश झाल्याचं निदर्शनात आल्या नंतर मग तर कॉनसपीरसी थेएरिज जगभर सुरू झाल्या. कोणी
म्हटलं इंजिनात बिघाड झाल्याने विमान क्रॅश झालं तर कोणी म्हटलं पायलटने आत्महत्या
केली. बरं या परिस्थितीत विमान हायजॅक केलं गेलं होतं का? पण अससुद्धा निदर्शनास आलं नाही. याचं कारण जर कोणी हायजॅक केलं असतं तर
कुठल्यानकुठल्या गटाने अपहरणाची जबाबदारी स्वीकारली असती. आणि विमानाचं अपहरण करून
दहशतवाद्यानी ते दक्षिण हिंद महासागरात का क्रॅश केलं असतं. बरं विमानातले सिग्नल आतून
कोणी केबिन क्रू ने त्याला आत्महत्या करण्यासाठी बंद केले असतील अशी शक्यता
वर्तवण्यात आली होती. पण केबिन क्रू पैकी आणि खुद्द कॅप्टनपैकी आधी कोणाच्याही
देहबोलीत किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यात काही बदल दिसून आला नाही. अजून एक
शक्यता वर्तवण्यात आली की विमानाला मीसाईलने पाडण्यात आले, पण मग अश्या प्रकारचे कुठलेही
अवशेष आणि पुरावे मिळाले नाहीत, आढळले नाहीत.
आज
विमान नाहीसं होण्याला आठ वर्ष झालीत, पण अजूनही विमान गायब होण्याचा पुरावा
मिळाला नाही. मलेशियन सरकारने Ocean Infinity या अमेरिकेतल्या खाजगी कंपनीची मदत इथे घेतली आहे, आता यापुढे नवीन
अद्ययावत उपकरणांसह या खाजगी कंपनीचे लोक
परत म्हणजे २०२३ च्या सुरवातीच्या काही दिवसात विमान शोधण्याचं मिशन परत नव्या
जोमाने सुरू करण्यात येणार आहे. Ocean Infinity चं विशेष
म्हणजे ही कंपनी समुद्राखालच्या किंवा महासागरच्या तळाशी असलेले अवशेष हे रोबोट
च्या सहाय्याने शोधून काढू शकते.
या
विमान दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या माणसांच्या नातेवाईकाना अजूनही आशा आहे की एम एच
३७० चं कोडं सुटू शकेल आणि त्यांच्याबद्दल माहिती कळू शकेल. शेवटी काहीतरी चांगलं घडेल
या आशेवरच तर जग चालतं...
-निखिल कासखेडीकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा