इंग्लंड ची भिस्त दुस-या महायुद्धात ज्यांच्याकडे नेविल चेम्बरलेन यांच्यानंतर सोपवली गेली आणि ज्यांनी ती कामगिरी फत्ते केली, असा हा दुस-या महायुद्धातील जगाचा शिल्पकार म्हणजे विन्स्टन चर्चिल. याच महिन्यामध्ये चर्चिल १९४० ला इंग्लंड चे प्रधान मंत्री झाले. त्यांचे पूर्ण नाव सर विन्स्टन लेओनार्ड स्पेन्सर चर्चिल. चर्चिल यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील लॉर्ड रँडोल्फ चर्चिल एक प्रभावी राजकारणी होते. ते Chancellor of the Exchequer होते, म्हणजे ज्याला आताच्या भाषेत वित्त मंत्री किवा अर्थ मंत्री म्हणता येईल. त्यांची आई जेनी जेरोम अमेरिकन सोशलाईट (फॅशन जगताशी निगडीत) होत्या. अशा अर्थाने ते एका बड्या आणि चांगल्या घरातून आले होते.
घरातल्या राजकीय
वातावरणाचा चर्चिल यांच्यावर खूप प्रभाव होता. तासंतास घरी येणा-या लोकांचे
त्यांच्या वडिलांशी होत असलेले संम्भाषण ते मग्न होऊन ऐकत. इथेच त्यांच्यावर एक
अस्सल राजकारणी होण्याचा संस्कार झाला.
चर्चिल यांनी काही काळ आर्मी मध्ये ऑफिसर म्हणून सेवा
केली. त्यांच्याकडे विविध जबाबदा-या देण्यात आल्या. ते काही वर्ष भारतात देखील
राहिले,
नंतर ते दक्षिण
आफ्रिकेला बोअर युद्धात सहभागी झाले आणि तिथे पकडले गेले, पण त्यातून देखील सहीसलामत पण
कसेबसे निसटले.
यामुळे चर्चिल वयाच्या २४ व्या वर्षीच प्रसिद्धीच्या
झोतात आले. यानंतर त्यांचे राजकीय जीवन चालू झाले. ते संसदेवर निवडून गेले आणि ३३
व्या वर्षी काबिनेट मंत्री झाले. पण त्यांना इंग्लंडचे पंतप्रधान व्हायला पुढची ३२
वर्ष वाट पहावी लागली. चर्चिल १० मे १९४० साली अत्यंत अनिश्चित वातावरणात
पंतप्रधान झाले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते पंतप्रधान पदावर राहिले.
अनिश्चित अशासाठी कि वॉर्सा वर हल्ला झाल्यापासून मित्र राष्रांप ना युद्धाचा
कोणाच्या बाजूने निकाल लागेल याची अजिबात माहिती नव्हती, म्हणून अश्या प्रसंगात पंतप्रधान
होणं आणि देशाचं नेतृत्व करणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती.
असं म्हणतात की, चर्चिल
यांना भारताबद्दल प्रचंड राग होता. ते भारतीयांना ''they are gross and corrupt'' (हे भारतीय घाणेरडे आणि भ्रष्ट
आहेत) असं म्हणायचे. चर्चिल यांनी काही काळ भारतात बंगलोरला घालवला. १८ मार्च १९३१
रोजी लंडन येथे झालेल्या 'Our Duty in India' या भाषणात त्यांनी भारतातल्या जाती व्यवस्थेवर कडाडून टीका केली
आहे.
चर्चिल एक वेगळीच व्यक्ती होती, त्यांच्याकडे कणखर वृत्ती होती, ते एक उत्तम संसदपटू होते, लेखक होते साहित्यिक होते, त्यांना साहित्यातले नोबेल
पारितोषिक मिळाले होते. त्यांची भाषणे त्यावेळी इंग्लंडच्या संसदेत खूप गाजत.
चर्चिल म्हणत ''Success consists of going from failure to failure, without
loss of enthusiasm'', म्हणजे
यश म्हणजे अपयाशाकडून अपयशाकडे उत्साह ढळू न देता वाटचाल करणे. लोकशाहीबद्दल
चर्चिल म्हणतात कि, लोकशाही
विरुद्ध उत्तम प्रतिवाद म्हणजे सर्वसामान्य लोकांशी पाच मिनिटे केलेली बातचीत.
दुस-या महायुध्हामधील चर्चिल यांनी गाजवलेला पराक्रम जबरदस्त आहे. दुस-या
महायुद्धातून सर्व मित्र राष्ट्रांना साहाय्य करण्यात पण त्याचबरोबर शत्रूला
नामोहरम करण्यात त्यांना यश आले. हे महायुद्ध जिंकणे, हिटलरच्या जर्मनीला, मुसोलिनीच्या इटलीला तसेच
जपानच्या हिरोहीतोला धूळ चाखायला लावणे हे काही येड्या गबाळ्याच काम नव्हतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा