दिनांक 24 डिसेंबर 1999... वेळ संध्याकाळी 5.20 ... नाताळच्या आधीचा दिवस...थंडीत गुरफटलेली ती एक नवी दिल्लीतली संध्याकाळ होती.. उन्हं कललेल होत नि साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालातून निघत असतांनाच परराष्ट्रमंत्री श्री जसवंत सिंह यांच्या टेबलावरचा फोन खणखणला.. आजूबाजूच्या शांत वातावरणात त्यांना तो आवाज फारच मोठा वाटला.. त्यांनी रिसिव्हर उचलून कानाला लावला... ‘ इंडियन एयरलाईन्सच्या आपल्या IC 814 या काठमांडू ते नवी दिल्ली विमानाचे अपहरण झाले आहे ’ ..पलीकडून काळजीयुक्त आवाजात कोणीतरी सांगत होत. ही बातमी कानावर पडताच ते चिंताग्रस्त झाले.... ही अपहरणाची बातमी त्यांना अशुभ वाटू लागली... यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे त्यांना कळत नव्हते. या अपहारणमागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट होत नव्हतं. पण जसाजसा वेळ गेला , तसतशी अधिक माहिती येऊ लागली.. एक निश्चित होत , या सगळ्यामागे तालिबानचा हात आहे... तालिबान म्हणजे त्यावेळेस अफगाणिस्तानात ज्यांचं शासन होतं ती मंडळी... पण त्यांच्या बरोबर भारताचे कुठलेच राजनैतिक संबंध नव्हते... नक्की काय झालं... ? 24 डिसेंबर 1999 ला संध्याकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे
चालू जागतिक घडामोडींचा अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक परिचय...