मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय विमान अपहरणात तालिबानचा सहभाग...!

  दिनांक 24 डिसेंबर 1999... वेळ संध्याकाळी 5.20 ... नाताळच्या आधीचा दिवस...थंडीत गुरफटलेली ती एक नवी दिल्लीतली संध्याकाळ होती.. उन्हं कललेल होत नि साऊथ ब्लॉकमधील आपल्या कार्यालातून निघत असतांनाच परराष्ट्रमंत्री श्री जसवंत सिंह यांच्या टेबलावरचा फोन खणखणला.. आजूबाजूच्या शांत वातावरणात त्यांना तो आवाज फारच मोठा वाटला.. त्यांनी रिसिव्हर उचलून कानाला लावला... ‘ इंडियन एयरलाईन्सच्या  आपल्या IC 814 या काठमांडू ते नवी दिल्ली विमानाचे अपहरण झाले आहे ’ ..पलीकडून काळजीयुक्त आवाजात कोणीतरी सांगत होत. ही बातमी कानावर पडताच ते चिंताग्रस्त झाले.... ही अपहरणाची बातमी त्यांना अशुभ वाटू लागली... यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे त्यांना कळत नव्हते. या अपहारणमागे कोणाचा हात आहे हे स्पष्ट होत नव्हतं. पण जसाजसा वेळ गेला , तसतशी अधिक माहिती येऊ लागली.. एक निश्चित होत , या सगळ्यामागे तालिबानचा हात आहे... तालिबान म्हणजे त्यावेळेस अफगाणिस्तानात ज्यांचं शासन होतं ती मंडळी... पण त्यांच्या बरोबर भारताचे कुठलेच राजनैतिक संबंध नव्हते...    नक्की काय झालं... ? 24 डिसेंबर 1999 ला संध्याकाळी ठरलेल्या वेळेप्रमाणे

तालिबानचे सध्याचे इस्लामी राष्ट्रांबरोबर असलेले संबंध

  तालिबान ... सदध्या अफगाणिस्तानात शरिया कायदा राबवण्याच्या उद्देशाने सत्ता ताब्यात घेणारी संघटना म्हणजे तालिबान... ‘ गुड तालिबान ’ आणि ‘ बॅड तालिबान ’ हा प्रकार अस्तित्वात नाही. जगभर इस्लामी राज्य स्थापन करण्याच्या उद्देशानेच जणू तालिबान आपली पावलं टाकताना दिसतं आहे. जगभर असलेली तथाकथित तज्ञ मंडळी म्हणत आहेत की तालिबान आता बदललं आहे आणि त्यांनी सर्वसमावेशक धोरण ठेवून महिला अन मुलांना समान वागणूक देणार असल्याचं जाहीर केलं आहे पण तसं तालिबानच्या कृतीतून अजिबात दिसत नाही. हा लेख लिहीत असताना ताज्या बातम्यांनुसार तालिबानबद्दल एक बातमी येऊन धडकली आहे. ती म्हटली तर अत्यंत चिंता वाढवणारी आहे आणि एकूणच गंभीरसुद्धा आहे  याचं कारण तालिबानची पावलं ज्या दिशेने पडत आहेत त्यावरून भविष्यात काय होईल याचा थोडा अंदाज बांधता येऊ शकतो. ती बातमी म्हणजे तालिबानच्या एका नेत्याने नुकतच असं म्हटलं आहे की अफगाणिस्तानात दिल्या जाणार्‍या शिक्षा जश्या पूर्वी तालिबान सत्तेवर असताना होत्या तश्याच स्वरुपात त्या परत अफगाणिस्तानात आणल्या जातील. यामध्ये हात पाय तोडणे , दगडाने ठेचून मारणे , तसंच त्यांच्यानुसार गुन्ह