मुख्य सामग्रीवर वगळा

भारतीय वायुदल आणि संरक्षण सिद्धता... !

 

एका अहवालनुसार भारतीय वायुदलाकडे असणारे सर्व प्रकारचे रिसोर्सेस कमी आहेत किंवा कमी होत चालले आहेत. उदाहरणार्थ. फायटर विमानांची संख्या, स्क्वाड्रंस ची संख्या, आकाशात इंधन भरण्यासाठी असणार्‍या एअर टँकर्स ची संख्या, क्षेपणास्त्र, रडार प्रणालीसाठी वापरण्यात येणारी व्यवस्था इत्यादि.

खरं म्हणजे एक मुद्दा उपस्थित होतो, आणि वारंवार चर्चिला जातो तो म्हणजे संरक्षणावर एखाद्या देशाला इतका खर्च करण्याची आवश्यकता आहे का? हे हजारो कोटी रुपये देशाच्या विकास कामांमध्ये सुद्धा खर्च करता येऊ शकतात. देशाला संरक्षण करण्याची आवश्यकताच नको भासायला... आजही स्वित्झर्लंड सारख्या देशाला स्वतःची आर्मी असून ते फक्त गरजेपुरतच त्याचा उपयोग करतात. त्यांचे सराव चालू असतात. आर्मीला बोलवण्याची फारच कमी गरज पडते. नव्हे नाहीच. आज व्हाटिकन ची सुरक्षा, पोप ची अंतर्गत सुरक्षा, हे सगळं सांभाळणारे स्वीझ गार्डस आहेत. ... असं म्हणतात डेन्मार्कमध्ये जेल बंद करण्याची वेळ आली आहे कारण तिथे गुन्हेच घडत नाहीत, त्यामुळे गुन्हेगार कुठून येणार, म्हणून मग तुरुंग बंद करण्यात येतात. विकसित देशांमध्ये खासकरून पाश्चिमात्य देशांमध्ये सुबत्ता आहे, संपत्ति आहे, चांगलं जीवनमान आहे. लोक सुखी आहेत. विज्ञानाचा प्रसार झाला आहे. लोकसंखेची घनता कमी आहे. इतक्या सगळ्या अनुकूल गोष्टी असताना तिथे शेजारी देशांमध्ये पण वादविवाद तंटे नाहीत. हे सगळं सांगायचा कारण म्हणजे भारताला लाभलेले शेजारी देश.

पाकिस्तान सारखा देश आणि चीनसारखा देश हे आपले शेजारी असल्याने आपल्याला स्वसंरक्षण करण्यासाठी स्वतःचे सैन्यदल त्यासाठी लागणारी यंत्रणा बाळगण गरजेचं आहे. यापैकी चीनसारख्या देशकडून 1962 ला भारतावर आक्रमण झाले होते त्याच्या आठवणी आहेतच, म्हणून मग खबरदारी म्हणजे काय तर देश नावच्या संकल्पानेत अपेक्षित असलेली व्यवस्था उभारण्यासाठी, स्व्संरक्षणार्थ सैन्यदलानची  उभारणी करणे अत्यावश्यक झाले आहे. चीन गुप्तता पळणारा देश आहे. याचा अर्थ चीनपासून धोका आहे असं नाही, पण इतिहासातून शिकले पाहिजे या उक्तीप्रमाणे खबरदारीचा उपाय म्हणून ही व्यवस्था. चीनची नीती सकारात्मक आहे, आणि चीन सुद्धा हे जाणून आहे की भारत हा शांतताप्रिय देश आहे. प्रश्न राहतो तो पाकिस्तानचा... पाकिस्तान हा देश दहशतवाद्यांचे जणू काही तळच बनला आहे. कश्मीर मध्ये आपल्याला सतत दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा सामना करावा लागतो आहे. भारताची निम्मी आर्मी भारत व्याप्त कश्मीर मध्ये स्थित आहे. पाकिस्तानला कश्मीर जिंकून घ्यायचा आहे. त्यासाठी कुरापत्या काढणे काही त्यांचे थांबत नाही. त्यासाठी भारतात खोटे चलन पसरवणे, फुटीरतावाद्यांना पाठबळ देणे, काश्मिरी जनतेच्या मनात भारतीय सैन्यदलांबद्दल आकस निर्माण करणे या गोष्टी सातत्याने पाकिस्तान करत आलेला आहे. हे सगळं थांबवण्यासाठी मग स्वसंरक्षण व्यवस्थेचा भाग म्हणून आणि, भविष्यात उद्भवणार्‍या समस्यांचा भाग म्हणून स्वतःच सैन्यदल असणं आवश्यक बनल आहे. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक देशाला त्यांची स्वतःची सैन्यदल आहेत. अर्थात त्यांचा उपयोग कमी ज्यास्त प्रमाणावर आणि गरजेनुसार केला जातो. युद्ध कोणालाही नको असतं, पण मग स्वसंरक्षण करणार तरी कसं?

मूळ मुद्यावर यायचे म्हणजे, भारतीय वायुदलाकडचे रिसोर्सेस आटत चालले आहेत, असं एक अहवाल सांगतो आहे. आपण 42 स्क्वाड्रंस ची योजना आखली होती, पण सध्या 30 स्क्वाड्रंसच आपल्याकडे आहेत. या सगळ्या लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रंस आहेत. आपल्याकडे रफेल सारखी विमान यायला काही अवधि जाणार आहे. त्याच्यावर राजकारण चालू होत मधल्या काळात. त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. सत्ताधार्‍यांकडून राजकारण केला जाणे आणि विरोधी पक्षांनी अत्यंत बेपरवाईने विधाने करणे हे अत्यंत निंदनीय प्रकार आपल्याकडे चालू होता. निदान संरक्षणाच्या बाबतीत तरी असे घोटाळे आणि भ्रष्टाचार हे कुठल्याही देशाला परवडणारे नाहीत. राफेल विमानखरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला की नाही हा पूर्णतः वेगळा विषय आहे.

वायुदलाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी लागणारा पैसा , राजकीय इछशक्ती इत्यादि गोष्टींची आज आवश्यकता आहे.

शेवटी एकच गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे भारतीय सैन्यदलांचे राजकीयीकरण त्यांच्यावर होणारे राजकारण या बाबी थांबल्या पाहिजेत. राष्ट्रीय सुरक्षा महत्वाची आहेच, पण म्हणून त्यावर राजकारण होता कामा नये.


निखिल कासखेडीकर.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...