मुख्य सामग्रीवर वगळा

अर्थशास्त्रातील विचारप्रवाह - २

 

फिजीओक्रॅटस चे योगदान !

 

मर्कनटॅलीजमच्या विरुध्द जाणारा आणि अर्थशास्त्रात एक मुलभूत स्वरूपाचे योगदान देणारा विचार प्रवाह म्हणजे फिजीओक्रसी. हा विचार प्रवाह फ्रांस मध्ये साधारणतः अठराव्या शतकात उदयास आला. झालं अस कि मर्कनटॅलीजमची हवा ओसरू लागल्यानंतर तसच मर्कनटॅलीजमच्या नियमांचा जवळपास कंटाळा आल्यानंतर फिजीओक्रसी या वेगळ्या वाटणाऱ्या आर्थिक विचारांनी लोकांचे लक्ष वेधले. लोकांना आता सोनं चांदी गोळा करा, वसाहती स्थापन करा, संपत्ती कमवा, व्यापारावर बंधने लादा या सगळ्या गोष्टींचा अगदी कंटाळा आला होता. यातून आपली सुटका कशी होईल आणि एक नवीन आर्थिक पद्धती कशी आणता येईल यासाठी मग प्रयत्न सुरु झाले. गम्मत म्हणजे या फिजीओक्रॅटसना स्वतःला अर्थतज्ञ म्हणून घ्यायला खूप आवडे.

 

मर्कनटॅलीजमच्या विरुध्द आवाज उठवणारा आणि आम्हाला बंधनातून मुक्त करा असा जणू नाराच देणारी व्यक्ती म्हणजे गुर्ने. याला फिजीओक्रॅटस चळवळीचा आघाडीचा नेता म्हणता येईल. त्याची वाक्य इतिहासात खूपच प्रसिद्ध झाली आणि त्याच्या या ब्रीद्वाक्याने आधुनिक अर्थशास्त्राचा पाया रचला असं आपण म्हणू शकतो. हे ब्रीदवाक्य म्हणजे ' लेझे फेअर ', म्हणजे बंधनातून मुक्तता. हि बंधने कशा स्वरुपाची तर आधी सांगितल्या प्रमाणे सरकारी हस्तक्षेपाची! फिजीओक्रॅटस म्हणायचे सरकारी हस्तक्षेपाच मुळात चुकीचा आहे, बाजाराला त्याचे काम करू द्या आणि अपोआप सगळ्या गोष्टी पूर्ववत होतील. इथे अर्थशास्त्रातली महत्वाची संकल्पना म्हणजे समतोल ज्याला इंग्रजीमध्ये Equilibrium म्हणता येईल.

 

बाजार व्यवस्थेमध्ये जर सरकारचा हस्तक्षेप झाला नाही तर बाजारात ( Market) गोष्टी अपोआप पूर्ववत होतात. उदाहरणार्थ, क्ष वस्तूची किंमत बाजारात वाढली तर त्या वस्तूची मागणी कमी होते आणि मग त्याचा पुरवठा आहे तसाच राहतो परिणामी क्ष वस्तूची किंमत परत कमी होते आणि मग परत मागणी वाढते, त्यानंतर पुरवठा वाढतो असं हे चक्र चालूच रहातं. पण हे सगळ होण्यासाठी मुक्त बाजार असणे मात्र बंधनकारक आहे. फिजीओक्रसी ची वैशिष्टे सांगायची झाल्यास यात प्रामुख्याने मुक्त व्यापारावर जोर दिला गेला. या फिजीओक्रॅटस मंडळींचा मुक्तता या गोष्टीवर भलताच विश्वास होतं. हि मंडळी म्हणत कि निसर्ग सगळं ठीक करतो त्यामुळे आपण ढवळाढवळ करायची गरज नाही. यांना सोनं चांदीमुळे देशाची भरभराट होते हे मुळीच पटत नसे, उलट हे म्हणत कि राष्ट्रात होणा-या उत्पादनामुळे देशाची प्रगती होते. यातली अजून काही महत्वाची वैशिष्टे म्हणजे शेतीला दिलेलं प्राधान्य, वयक्तिक संपत्तीचा अधिकार, गुंतवणुकीसाठी भांडवलाला महत्व इ. फिजीओक्रॅटसच्या मते शेतकरी आणि शेतमजूर हेच खरे उत्पादक आहेत, उद्योगाने मात्र संपत्ती वाढत नाही किंवा राष्ट्रीय उत्पादनात तितकीशी भर पडत नाही. उद्योगातील कामगार हे संपत्तीमध्ये कुठलीच भर घालत नाहीत, तर फक्त शेतकरीच संपत्तीमध्ये भर घालतात आणि त्यांचा देशाच्या आर्थिक वाढीत मोलाचा सहभाग असतो असा ठाम विश्वास फिजीओक्रॅटस मंडळींचा होता.

 

फिजीओक्रसीतले महत्वाचे शिलेदार म्हणजे फ्रांस्वा केने, तुर्गो, डूपाँ, गुर्ने आणि मिराबू. यातला फ्रांस्वा केने हा खरं नेता होता आणि त्याचे शिष्य म्हणजे वरील सगळी मंडळी. यात अजून एक महत्वाचा फिजीओक्रॅट म्हणजे व्बागील्बेर. या सगळ्या फिजीओक्रॅटसनी अर्थशास्त्रात फार महत्वाचे योगदान दिले आहे, नवीन संकल्पना ज्या आजवर माहिती नव्हत्या त्या तयार केल्या, त्यांचा अभ्यास केला, आणि त्याचा उपयोग कुठे करता येईल हे जाणले. यातल्या महत्वाच्या संकल्पना म्हणजे टॅब्लू इकॉनॉमिक म्हणजे अर्थव्यवस्थेची प्रतिकृती, चक्राकार पैशाचे स्वरूप आणि इकॉनॉमिक सरप्लस! अश्या ह्या फिजीओक्रॅटस मंडळीचे योगदान अर्थव्यवस्थेला तसेच अर्थशास्त्राला चालना देणारे ठरले.


-निखिल कासखेडीकर  

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...