मुख्य सामग्रीवर वगळा

आधुनिक व्यापारातील संकल्पना -1

 व्यापारातील संरक्षण !

 

दोन देशांचा एकमेकांशी व्यापार ही आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील एक मुलभूत स्वरुपाची संकल्पना आहे. व्यापाराचे महत्व तसे जुनेच. फरक एवढाच आहे कि पूर्वी व्यापार हा समुद्र मार्गाने व्हायचा तर आज तो हवाईमार्गानेपण होतो. अनेक तज्ञांना असे पुरावे मिळाले आहेत कि भारताचा व्यापार अगदी पार इजिप्त पर्यंत पसरला होता. तिथे अनेक वस्तू उत्खननात सापडल्या आहेत आणि त्या वस्तूंवरून, त्या अस्सल भारतीय आहेत, असे समजते. आपल्या सगळ्यांना पूर्वी सिल्क रुट नामक एक मार्ग होता, ज्याने आपला आणि मध्य आशिया, विशेषतः चीनशी आपला आर्थिक व्यवहार चालायचा, हे माहित असेलच. पण आज व्यापाराचे स्वरूप जरा क्लिष्ट झाले आहे. यात अनेक विचारप्रवाह आले आहेत आणि एक विचारप्रवाह जणू आधुनिक मर्कनटॅलीजमच वाटावा असा आहे.

मर्कनटॅलीजम मध्ये आपण हे पाहीलेच कि व्यापाराला संरक्षण देणे तसेच, सोने चांदी गोळा करणे आवश्यक. पण, असं करत असताना हे सोनं चांदी बाहेर जाणार नाही आणि इतर देशांना मिळणार नाही याचीहि काळजी घेणे असा स्वार्थी दृष्टीकोण या आर्थिक विचारसरणीमध्ये होता. अश्याच काही स्वरूपाचा ज्याला मर्कनटॅलीजमचे Extended version म्हणता येईल असा विचार म्हणजे व्यापारातील आर्थिक संरक्षण. इंग्रजीत सांगायचा झाल्यास या विचारसरणीला Protectionism असं संबोधता येईल. प्रोटेक्षनिजम म्हणजे परदेशी मालांच्या स्पर्धेत स्वदेशी मालाला दिलेले संरक्षण. मग या संरक्षणात अनेक प्रकार आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास वस्तूंवर टेरीफ लावण्याची पद्धत आहे. टेरीफ म्हणजे एक प्रकारच जणू टॅक्सच. आता हा टॅक्स कसा लावला जातो? तर, ज्या प्रकारच्या वस्तूंची आयात होते, त्या प्रकारच्या वस्तूंवर टॅक्स लावला जातो. यामुळे होत काय कि परकीय वस्तूंच्या किमती वाढतात आणि मग आपल्या देशातले लोक आयात केलेल्या वस्तुंच्या ऐवजी स्वदेश बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देतात आणि त्याच शेवटी विकत घेतात. बंधने घालण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे इम्पोर्ट कोटा. ह्या इम्पोर्ट कोट्याचा प्रमुख उद्देश म्हणजे, आयात केलेल्या वस्तूंची संख्या कमी करणे आणि परिणामतः त्यांच्या बाजारातील किमती वाढवणे. यामागे उद्देश हाच कि स्वदेशी व्यापाराला चालना मिळेल आणि मग लोक आपल्याच देशात तयार झालेल्या वस्तू विकत घेतील आणि मग पैसा हा आपल्याच देशात खेळता राहील, राष्ट्रीय उत्पादन वाढेल, संपत्ती वाढेल.

ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आजचं आधुनिक अर्थशास्त्र सांगत कि व्यापाराला संरक्षण हा प्रकारच मुळात चुकीचा आहे. कारण याने नुकसान शेवटी ज्या देशाने कर लादले त्या देशाचेच होणार आहे, कारण शेवटी वस्तूंच्या गुणात्मकतेवर परिणाम होऊन जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरायची वेळ आली, तर जवळपास आपण तयार केलेल्या वस्तू या बादच होतील आणि त्या कोणीही विकत घेणार नाही. अशा पद्धतीने ब-याच आधुनिक अर्थतज्ञांनी व्यापारात संरक्षण देण्याला विरोध केला आहे. पाश्चिमात्य देश तर या संरक्षण देण्याच्या प्रकारच्या अगदी कमालीच्या विरोधात आहेत. जी-20 समूहाने पण या संदर्भात कडक भूमिका घेऊन 'व्यापाराला संरक्षण देणे, म्हणजे संकुचितपणाचे लक्षण आहे' अशी हेटाळणीच केली आहे.

यात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, जे लोक व्यापाराला संरक्षण देण्याच्या बाजूचे आहेत ते म्हणतात, जर आपल्या देशात एखादा नवीन उद्योग जर चालू झाला आणि त्यातच आपल्याला परदेशी उद्योगांबरोबर सामना करण्याची वेळ जर आली तर काय? मग नको रे बाबा स्पर्धा नकोच! आपण बऱ आणि आपले उद्योग बरे! अश्या स्वरूपाचे विचार काही तज्ञांनी मांडून ठेवले आहेत. इंग्रजीत याला Infant Industry Argument असं संबोधतात.

अशी हि व्यापाराला संरक्षण देण्याची प्रणाली आता फारच कमी देश स्वीकारण्याच्या तयारीत आहेत, कारण मुळात ज्या जागतिक संघटना तयार झाल्या त्यांचा या विचारांना प्रखर विरोध आहे आणि खरं सांगायचं झाल्यास त्या संघटनांवर पाश्चिमात्य जगाचे नियंत्रण आहे. म्हणून आता Protectionism च्या फंदात कोणी पडत नाही.

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...