मुख्य सामग्रीवर वगळा

सर विन्स्टन चर्चिल - एक मुत्सद्दी राजकारणी.

 इंग्लंड ची भिस्त दुस-या महायुद्धात ज्यांच्याकडे नेविल चेम्बरलेन यांच्यानंतर सोपवली गेली आणि ज्यांनी ती कामगिरी फत्ते केली, असा हा दुस-या महायुद्धातील जगाचा शिल्पकार म्हणजे विन्स्टन चर्चिल. याच महिन्यामध्ये चर्चिल १९४० ला इंग्लंड चे प्रधान मंत्री झाले. त्यांचे पूर्ण नाव सर विन्स्टन लेओनार्ड स्पेन्सर चर्चिल. चर्चिल यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील लॉर्ड रँडोल्फ चर्चिल एक प्रभावी राजकारणी होते. ते Chancellor of the Exchequer होते, म्हणजे ज्याला आताच्या भाषेत वित्त मंत्री किवा अर्थ मंत्री म्हणता येईल. त्यांची आई जेनी जेरोम अमेरिकन सोशलाईट (फॅशन जगताशी निगडीत) होत्या. अशा अर्थाने ते एका बड्या आणि चांगल्या घरातून आले होते. 



घरातल्या राजकीय वातावरणाचा चर्चिल यांच्यावर खूप प्रभाव होता. तासंतास घरी येणा-या लोकांचे त्यांच्या वडिलांशी होत असलेले संम्भाषण ते मग्न होऊन ऐकत. इथेच त्यांच्यावर एक अस्सल राजकारणी होण्याचा संस्कार झाला.

 

चर्चिल यांनी काही काळ आर्मी मध्ये ऑफिसर म्हणून सेवा केली. त्यांच्याकडे विविध जबाबदा-या देण्यात आल्या. ते काही वर्ष भारतात देखील राहिले, नंतर ते दक्षिण आफ्रिकेला बोअर युद्धात सहभागी झाले आणि तिथे पकडले गेले, पण त्यातून देखील सहीसलामत पण कसेबसे निसटले.

 

यामुळे चर्चिल वयाच्या २४ व्या वर्षीच प्रसिद्धीच्या झोतात आले. यानंतर त्यांचे राजकीय जीवन चालू झाले. ते संसदेवर निवडून गेले आणि ३३ व्या वर्षी काबिनेट मंत्री झाले. पण त्यांना इंग्लंडचे पंतप्रधान व्हायला पुढची ३२ वर्ष वाट पहावी लागली. चर्चिल १० मे १९४० साली अत्यंत अनिश्चित वातावरणात पंतप्रधान झाले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते पंतप्रधान पदावर राहिले. अनिश्चित अशासाठी कि वॉर्सा वर हल्ला झाल्यापासून मित्र राष्रांप ना युद्धाचा कोणाच्या बाजूने निकाल लागेल याची अजिबात माहिती नव्हती, म्हणून अश्या प्रसंगात पंतप्रधान होणं आणि देशाचं नेतृत्व करणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती.

 

असं म्हणतात की, चर्चिल यांना भारताबद्दल प्रचंड राग होता. ते भारतीयांना ''they are gross and corrupt'' (हे भारतीय घाणेरडे आणि भ्रष्ट आहेत) असं म्हणायचे. चर्चिल यांनी काही काळ भारतात बंगलोरला घालवला. १८ मार्च १९३१ रोजी लंडन येथे झालेल्या 'Our Duty in India' या भाषणात त्यांनी भारतातल्या जाती व्यवस्थेवर कडाडून टीका केली आहे.

 

चर्चिल एक वेगळीच व्यक्ती होती, त्यांच्याकडे कणखर वृत्ती होती, ते एक उत्तम संसदपटू होते, लेखक होते साहित्यिक होते, त्यांना साहित्यातले नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांची भाषणे त्यावेळी इंग्लंडच्या संसदेत खूप गाजत. चर्चिल म्हणत ''Success consists of going from failure to failure, without loss of enthusiasm'', म्हणजे यश म्हणजे अपयाशाकडून अपयशाकडे उत्साह ढळू न देता वाटचाल करणे. लोकशाहीबद्दल चर्चिल म्हणतात कि, लोकशाही विरुद्ध उत्तम प्रतिवाद म्हणजे सर्वसामान्य लोकांशी पाच मिनिटे केलेली बातचीत. दुस-या महायुध्हामधील चर्चिल यांनी गाजवलेला पराक्रम जबरदस्त आहे. दुस-या महायुद्धातून सर्व मित्र राष्ट्रांना साहाय्य करण्यात पण त्याचबरोबर शत्रूला नामोहरम करण्यात त्यांना यश आले. हे महायुद्ध जिंकणे, हिटलरच्या जर्मनीला, मुसोलिनीच्या इटलीला तसेच जपानच्या हिरोहीतोला धूळ चाखायला लावणे हे काही येड्या गबाळ्याच काम नव्हतं.

 

दुस-या महायुद्धाचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि, हिटलर ने उघडलेली आघाडी अत्यंत मजबूत होती, त्याच्याकडे पँझर डिविजन होती, गोबेल्स, रोमेल, रीबेन्त्रोप, हिमलर सारखे एकसे बढकर एक असे सेनापती होते, मुसोलीनिसारखा मित्र होता, अश्या युद्धखोर हिटलरला अडवणं आणि प्रतिहल्ला करणं म्हणजे महाभयंकर काम, पण तरीही इंग्लंड ला विजय मिळवून देण्यात आणि मित्र राष्ट्रांची मोर्चेबांधणी करण्यात चर्चिल यांचे योगदान महत्वाचे आहे. या योगदानात त्यांना रूझवेल्ट आणि स्टालिन यांची साथ होती. चर्चिल ब-याच वेळेला युद्धभूमीवर जायचे, रणनीती आखायचे आणि वेळोवेळी आपल्या सैनिकांना प्रेरणा द्यायचे. अश्या ''वॉर्सा ते हिरोशिमा'' रंगलेल्या युद्धात इंग्लंडची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात यशस्वी होणे आणि आपल्या देशाला वैभव प्राप्त करून देणे हे सर्वात प्रमुख उद्दिष्ट चर्चिल यांच्यापुढे होते. चर्चिल यांनी युध्द जिंकून हे दाखवून दिले कि इंग्लंड एक सशक्त आणि झालेला हल्ला परतवण्यास समर्थ राष्ट्र आहे. ह्या त्यांच्या सर्व कामगिरीमुळे विन्स्टन चर्चिल यांच्याकडे एक महान जेता म्हणूनच पाहिलं जाईल यात शंका नाही.

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...