मुख्य सामग्रीवर वगळा

सर विन्स्टन चर्चिल - एक मुत्सद्दी राजकारणी.

 इंग्लंड ची भिस्त दुस-या महायुद्धात ज्यांच्याकडे नेविल चेम्बरलेन यांच्यानंतर सोपवली गेली आणि ज्यांनी ती कामगिरी फत्ते केली, असा हा दुस-या महायुद्धातील जगाचा शिल्पकार म्हणजे विन्स्टन चर्चिल. याच महिन्यामध्ये चर्चिल १९४० ला इंग्लंड चे प्रधान मंत्री झाले. त्यांचे पूर्ण नाव सर विन्स्टन लेओनार्ड स्पेन्सर चर्चिल. चर्चिल यांचा जन्म एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील लॉर्ड रँडोल्फ चर्चिल एक प्रभावी राजकारणी होते. ते Chancellor of the Exchequer होते, म्हणजे ज्याला आताच्या भाषेत वित्त मंत्री किवा अर्थ मंत्री म्हणता येईल. त्यांची आई जेनी जेरोम अमेरिकन सोशलाईट (फॅशन जगताशी निगडीत) होत्या. अशा अर्थाने ते एका बड्या आणि चांगल्या घरातून आले होते. 



घरातल्या राजकीय वातावरणाचा चर्चिल यांच्यावर खूप प्रभाव होता. तासंतास घरी येणा-या लोकांचे त्यांच्या वडिलांशी होत असलेले संम्भाषण ते मग्न होऊन ऐकत. इथेच त्यांच्यावर एक अस्सल राजकारणी होण्याचा संस्कार झाला.

 

चर्चिल यांनी काही काळ आर्मी मध्ये ऑफिसर म्हणून सेवा केली. त्यांच्याकडे विविध जबाबदा-या देण्यात आल्या. ते काही वर्ष भारतात देखील राहिले, नंतर ते दक्षिण आफ्रिकेला बोअर युद्धात सहभागी झाले आणि तिथे पकडले गेले, पण त्यातून देखील सहीसलामत पण कसेबसे निसटले.

 

यामुळे चर्चिल वयाच्या २४ व्या वर्षीच प्रसिद्धीच्या झोतात आले. यानंतर त्यांचे राजकीय जीवन चालू झाले. ते संसदेवर निवडून गेले आणि ३३ व्या वर्षी काबिनेट मंत्री झाले. पण त्यांना इंग्लंडचे पंतप्रधान व्हायला पुढची ३२ वर्ष वाट पहावी लागली. चर्चिल १० मे १९४० साली अत्यंत अनिश्चित वातावरणात पंतप्रधान झाले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ते पंतप्रधान पदावर राहिले. अनिश्चित अशासाठी कि वॉर्सा वर हल्ला झाल्यापासून मित्र राष्रांप ना युद्धाचा कोणाच्या बाजूने निकाल लागेल याची अजिबात माहिती नव्हती, म्हणून अश्या प्रसंगात पंतप्रधान होणं आणि देशाचं नेतृत्व करणं ही अत्यंत कठीण गोष्ट होती.

 

असं म्हणतात की, चर्चिल यांना भारताबद्दल प्रचंड राग होता. ते भारतीयांना ''they are gross and corrupt'' (हे भारतीय घाणेरडे आणि भ्रष्ट आहेत) असं म्हणायचे. चर्चिल यांनी काही काळ भारतात बंगलोरला घालवला. १८ मार्च १९३१ रोजी लंडन येथे झालेल्या 'Our Duty in India' या भाषणात त्यांनी भारतातल्या जाती व्यवस्थेवर कडाडून टीका केली आहे.

 

चर्चिल एक वेगळीच व्यक्ती होती, त्यांच्याकडे कणखर वृत्ती होती, ते एक उत्तम संसदपटू होते, लेखक होते साहित्यिक होते, त्यांना साहित्यातले नोबेल पारितोषिक मिळाले होते. त्यांची भाषणे त्यावेळी इंग्लंडच्या संसदेत खूप गाजत. चर्चिल म्हणत ''Success consists of going from failure to failure, without loss of enthusiasm'', म्हणजे यश म्हणजे अपयाशाकडून अपयशाकडे उत्साह ढळू न देता वाटचाल करणे. लोकशाहीबद्दल चर्चिल म्हणतात कि, लोकशाही विरुद्ध उत्तम प्रतिवाद म्हणजे सर्वसामान्य लोकांशी पाच मिनिटे केलेली बातचीत. दुस-या महायुध्हामधील चर्चिल यांनी गाजवलेला पराक्रम जबरदस्त आहे. दुस-या महायुद्धातून सर्व मित्र राष्ट्रांना साहाय्य करण्यात पण त्याचबरोबर शत्रूला नामोहरम करण्यात त्यांना यश आले. हे महायुद्ध जिंकणे, हिटलरच्या जर्मनीला, मुसोलिनीच्या इटलीला तसेच जपानच्या हिरोहीतोला धूळ चाखायला लावणे हे काही येड्या गबाळ्याच काम नव्हतं.

 

दुस-या महायुद्धाचा अभ्यास केला तर लक्षात येईल कि, हिटलर ने उघडलेली आघाडी अत्यंत मजबूत होती, त्याच्याकडे पँझर डिविजन होती, गोबेल्स, रोमेल, रीबेन्त्रोप, हिमलर सारखे एकसे बढकर एक असे सेनापती होते, मुसोलीनिसारखा मित्र होता, अश्या युद्धखोर हिटलरला अडवणं आणि प्रतिहल्ला करणं म्हणजे महाभयंकर काम, पण तरीही इंग्लंड ला विजय मिळवून देण्यात आणि मित्र राष्ट्रांची मोर्चेबांधणी करण्यात चर्चिल यांचे योगदान महत्वाचे आहे. या योगदानात त्यांना रूझवेल्ट आणि स्टालिन यांची साथ होती. चर्चिल ब-याच वेळेला युद्धभूमीवर जायचे, रणनीती आखायचे आणि वेळोवेळी आपल्या सैनिकांना प्रेरणा द्यायचे. अश्या ''वॉर्सा ते हिरोशिमा'' रंगलेल्या युद्धात इंग्लंडची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात यशस्वी होणे आणि आपल्या देशाला वैभव प्राप्त करून देणे हे सर्वात प्रमुख उद्दिष्ट चर्चिल यांच्यापुढे होते. चर्चिल यांनी युध्द जिंकून हे दाखवून दिले कि इंग्लंड एक सशक्त आणि झालेला हल्ला परतवण्यास समर्थ राष्ट्र आहे. ह्या त्यांच्या सर्व कामगिरीमुळे विन्स्टन चर्चिल यांच्याकडे एक महान जेता म्हणूनच पाहिलं जाईल यात शंका नाही.

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...