मुख्य सामग्रीवर वगळा

आणि ट्रॅफिक सुरू झाली – सुएझ कालवा.

 23 मार्च 2021 या दिवशी एव्हर गिव्हन हे महाकाय मालवाहू जहाज 7.40 या इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार सुएझ कालव्यात अडकून पडलं होतं. हे जहाज अगदी नाट्यमयरित्या अश्या पद्धतीने कालव्यात अडकून पडलं आणि रुतून बसलं की तिरपं झाल्यामुळे सुएझ कालवा जवळपास जलवाहतुकीसाठी जणू बंदच झाला. हे जहाज त्यावेळी मनशीयेत रुगोला या गावाजवळ कालव्याच्या किनार्‍यात अडकून बसलं. जवळपास सहा दिवस उलटून गेले तरीसुद्धा फसलेलं जहाज बाहेर काढण्यात अपयश येत होतं.



एव्हर गिव्हनला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू होते. 14 टग बोटी या मोहिमेत जुंपल्या होत्या. टग बोटींचा उपयोगच मुळी मोठ्या जहाजाना बंदराच्या क्षेत्रात त्यांचे जहाज पार्क करण्यासाठी होतो. तसच दिशा दाखवण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो. तर अश्या प्रकारे या टग बोटी रात्रंदिवस असं जवळपास 6 दिवस एव्हर गिव्हनला केबल द्वारे पाण्यात आणण्यासाठी ओढत होत्या, तर काही टग बोटी एव्हर गिव्हनला अक्षरशः पाण्यात ढकलत होत्या. या टग बोटींचा वेग खूप असल्यामुळे त्या त्यांची ताकद वापरुन जहाज ओढत तरी होत्या किंवा ढकलत तरी होत्या. हे काम रात्रंदिवस सलग सहा दिवस चालू होते. या मोहिमेमधे अनेक मशीन ऑपरेटर्स, इंजिनियर्स, टग बोट कॅप्टन्स आणि ज्यांना साल्व्हेज ऑपरेटर्स म्हणता येईल अश्या सगळ्या तज्ञांची फौजच जणू काम करत होती. यासाठी जेसीबी यंत्रे वापरुन जहाजाचा पुढच्या भागात जिथे त्याचं पुढचं टोक रुतून बसलं आहे तिथली वाळू आणि चिखल हे उपसण्यात आले. पण सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती टेंथ ऑफ रमादान आणि मशहूर या दोन ड्रेजर जहाजांनी. ड्रेजर बोटींचं कामच मुळी पाण्यातली वाळू आणि चिखल उपसून काढून तो बाजूला करणे हे असतं. आपण कल्पना करू शकणार नाही इतकी म्हणजे 30,000 घनफुट रेती बाजूच्या भागातून उपसण्यात आली. या उपश्याची तुलना करायची झाल्यास सगळ्यात मोठे असे ऑलिंपिक स्पर्धेतले 12 पोहण्याचे तलाव भरतील इतकी माती, रेती त्यातून उपसून काढण्यात आली. वेगवेगळी तज्ञ मंडळी यासाठी अहोरात्र काम करत होती. जहाजाच्या पुढची आणि मागची अश्या दोन्ही भागातली माती उपसून पाण्यामुळे आपोआपच तिरपं असलेलं हे जहाज सरळ होईल अश्या पद्धतीने हे रेस्क्यू मिशन चाललं होतं. आपल्याला माहिती आहे की भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्याचं काम सुएझ कालवा करत असल्यामुळे यावेळी समुद्राच्या भरतीची म्हणजेच हाय टाईडची खूप मोठी मदत या प्रसंगी रेस्क्यू टीमला झाली. भरती म्हणजे समुद्रामधील पाणी किनार्‍याच्या दिशेने वाहणे म्हणजे या उसळणार्‍या लाटा आहे त्या जागी असलेल्या वस्तूला बाहेर किनार्‍याकडे ढकलतात. या वेळेस सुपरमून असल्याने म्हणजेच पोर्णिमा असल्याने चंद्रामुळे भरती आली आणि म्हणूनच लाटांच्या वेगाने जहाजाला ढकलण्यासाठी आणि ते जहाज हलण्यासाठी मदत झाली. या सगळ्यानंतर तिरपं झालेलं जहाज थोडं सरळ झालं म्हणजे पारशली रिफ्लोट करायला मदत झाली. त्यानंतर अथक मेहनत घेतल्यानंतर सगळ्यांना सुखावणारी बातमी आली की रेस्क्यू टीमला रुतून बसलेलं जहाज बाहेर काढण्यात यश आलं. आणि एकदाचं तिरपं झालेलं जहाज सरळ झालं.  

सगळ्या प्रयत्नांना यश येऊन अखेर 29 मार्च 2021 ला दुपारी 3.05 ला इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार हे जहाज परत पाण्यात ढकलण्यात आणि वाहतूक मोकळी करण्यात यश आलं. आणि यानंतर सुएझ कनोल अथोरीटीचे प्रमुख अॅडमिरल ओसामा राबी यांनी जाहीर केले की सुएझ कालव्यातली जलवाहतुक पूर्वीप्रमाणे सुरळीत झाली आहे आणि इजिप्तच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता जहाजांच्या आवागमनासाठी कालवा सज्ज आहे.

एव्हर गिव्हन मातीतून आणि पाण्यातून निघाल्यानंतर, पुढच्या तांत्रिक गोष्टींसाठी आणि इन्स्पेक्षनसाठी ग्रेट बिटर लेक येथे नेण्यात आले. तिथे जहाजाचे काही नुकसान झाले आहे का आणि त्यावरचा सगळा क्र्यु व्यवस्थित आहेना याचीसुद्धा तपासणी करण्यात आली.

एव्हर गिव्हन जहाज आता त्याच्या मार्गावर इछित स्थळी पोहोचत असलं तरीसुद्धा साधारणतः 400 जहाजं सुएझ कालव्याच्या दोन्ही बाजूंना अडकून पडल्यामुळे त्यांना पार करायला अजून वेळ लागेल. तसंच या सगळ्यामुळे जागतिक व्यापारावर जो काही परिणाम झाला आहे तो पूर्ववत होण्यासाठी दोन महीने तरी लागतील असा तज्ञांचा कयास आहे. यामुळे एक समस्या उभी राहणार आहे, ती म्हणजे वेगवेगळ्या बंदरात त्यांच्या जागेत जहाज पार्क करण्यासाठी अडथळे येणार आहेत. याचं कारण अनेक जहाजं एकाच वेळी बंदरात दाखल झाल्यामुळे त्यांना जहाज पार्क कुठे करायचं असा (जागेचा) प्रश्न निर्माण होईल. यासाठी थोडा वेळ लागेल.

एव्हर गिव्हन हे जहाज रुतण्यामुळे निर्माण झालेली परिस्थिति हा एक अनुभव समजून त्यापासून धडा घेतला जाऊ शकतो. भविष्यात अश्या प्रकारची समस्या उद्भवली तर काय उपाय योजना करायच्या हे सुद्धा आता जगाला कळेल आणि त्या प्रमाणे संबंधित घटक पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे. जागतिक व्यापारावर परिणाम झाल्यामुळे या सगळ्याचा फटका जेव्हढा शिपिंग उद्योगाला बसला तेवढाच जलवाहतुकीला सुद्धा बसला आहे. या एका गोष्टीमुळे सुएझ कालव्याचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे आणि भविष्यात उद्भवू शकणार्‍या समस्या सोडवण्यासाठी या आलेल्या अनुभवांचा उपयोग होईल, अशी आशा करुयात.

- निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...