मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीलंका आर्थिक गर्तेच्या छायेत... ?

 भाग-2

भारताची भूमिका-

भारत आणि श्रीलंका संबंध हे अत्यंत जुने, विश्वासपूर्ण आणि परस्पर सहकार्याचे राहिले आहेत. संकृती आणि धर्म या दोन गोष्टींचा प्रभाव भारत - श्रीलंका संबंधांवर दीर्घ काळापासून होत आला आहे. सामान्य भारतीय माणसाला रावणाची लंका म्हणून श्रीलंका माहिती आहे. त्याला ऐतिहासिक महत्व आहे. श्रीलंकेत ७५% लोकसंख्या ही सिंहली आहे. तर उरलेले २५ % लोक हे तमिळ आहेत. सिंहली भाषेचं मूळ हे ब्राह्मी भाषेत आहे. या भाषा इंडो-आर्यन भाषा म्हणून ओळखल्या जातात. पण यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंहलीचा सिंहा शब्द हा मूळ संस्कृत भाषेतला आहे. सिंहा म्हणजे सिंह, सिंहाचा प्रदेश म्हणून या प्रदेशाला महत्व आहे.

अश्या ऐतिहासिक महत्व असलेल्या श्रीलंकेला मात्र कोरोंनाची झळ बसलेली आहे. पर्यटन क्षेत्र तर कोलमडलं आहे, पर्यटन क्षेत्राला पूर्वीसारखे सुगीचे दिवस कधी येतील याबद्दल काहीही तर्क करता येत नाही, परिणामी श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर याचा थेट परिणाम होतो आहे. श्रीलंकेची परकीय गंगाजळीसुद्धा कमी होत चालली आहे, आणि २०२२ मध्ये तर अर्थव्यवस्था पुर्णपणे कोलमडणार अशी परिस्थिती आहे. चीनकडून श्रीलंकेने भरमसाठ कर्ज घेतलं आहे. ते परत करायला सुद्धा सरकारकडे पैसे नाहीत... तसच श्रीलंकन सरकारने कर कमी केले असल्यामुळे करातून जे उत्पन्न आलं असतं तेसुद्धा आता येत नाही. अश्या सगळ्या आघाड्यांवर सरकार अपयशी ठरते की काय असं वाटत आहे. या सगळ्यात मग शेजारील देश श्रीलंकेला मदत करत आहेत का हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. भारतापूरतं बोलायचं झाल्यास भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले तसं, भारत श्रीलंकेच्या पाठीशी नेहमीप्रमाणे भक्कमपणे उभा आहे. अगदी डिसेंबर २०२१ मध्ये श्रीलंकेचे अर्थमंत्री बसील राजपकसे हे भारत भेटीवर आले होते. याचं कारण भारत श्रीलंकेला तातडीची आर्थिक मदत देणार होता. एवढच काय तर, श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीसुद्धा भेट घेतली. भारत श्रीलंकेला अन्नधान्य आणि आरोग्यसुरक्षे संबंधित पॅकेज देणार होता, तसच ऊर्जा सुरक्षेसंदर्भात सुद्धा मदत करणार अशी बोलणी झाली. भारत श्रीलंकेला कच्या तेलाचा पुरवठा करणार आहे. तसच ट्रिंकोमाली ऑइल टॅंक फार्म बद्दल सुद्धा मदत करण्याची बोलणी झाली.

एक अत्यंत महत्वाची माहिती इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे रासायनिक खतांबाबतची... चीनने श्रीलंकेला मध्यंतरी मदत म्हणून रासायनिक खतांचा पुरवठा केला होता, पण ती खते इतकी निकृष्ट दर्जाची होती की तिला नकार द्यावा लागला. शेवटी भारत पुढे आला आणि भारताने त्वरित श्रीलंकेला खतांचं बेल आऊट पॅकेज दिलं...

श्रीलंका तर एक उदाहरण आहे, अशी असंख्य उदाहरणं आहेत, ज्यामधे भारताने भेदभाव न करता नेहमीच शेजारी राष्ट्र असो किंवा पाकिस्तान सारखा देश असो सगळ्यांना मानवतेच्या दृष्टीकोणातून मदत केली आहे. हाच भारतीय परराष्ट्र धोरणाचा पाया आपण मजबूत करत आहोत आणि करत राहू.

भारत - श्रीलंका संबंधांमध्ये मध्यंतरी दुरावा आला होता, याचं कारण २०१५ ला श्रीलंकेतल्या निवडणुकीत भारताच्या रॉ या गुप्तचर संस्थेने ढवळाढवळ केली होती असा आरोप करण्यात आला होता. यासंदर्भात श्रीलांकन सरकारने काही व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं. पण ही कटुता पुढच्या काळात तशीच राहिली नाही, तर भारत सरकारने मदतीचा हात पुढे केला. चीन हा देश बेभरवशाचा आहे याची पुरेपुर जाणीव श्रीलंकेला झाली आहे असं आपण म्हणू शकतो...

भारतात २०१४ ला भाजपा प्रणीत सरकार आल्यानंतर मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेजारील राष्ट्रांना बरोबर घेण्याचं वचन दिलं होतं, यानुसारच भारत सार्क देशांना मदत करत आहे. श्रीलंकेला भारत मदत करतो आहे आणि भविष्यातही करत राहील, अशी आशा बहुदा श्रीलंकन सरकारला असल्यामुळे भारतासाठी ही नामी संधी आहे... याप्रसंगी भारताने योग्य पावले उचलली आहेत आणि त्याचा एक भाग म्हणून चीनला दूर ठेवून भारत श्रीलंकेला भविष्यातसुद्धा मदत करत राहील...!    

                                 समाप्त!

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...