मुख्य सामग्रीवर वगळा

कॅनडाचे पंतप्रधान झाले भूमिगत!

 मित्रांनो, आपल्यासारख्या सामान्य भारतीयांना वाटत असेल की भारतासारख्या देशात लोकशाही असूनसुद्धा सतत काहीतरी मोर्चे, बंद किंवा लॉकडाउन होत असतात. यात तथ्य आहे. पण तुम्हाला जर सांगितलं की कॅनडासारख्या पाश्चिमात्य आणि अतिप्रगत देशात वस्तूंची ने आण करणार्‍या ट्रक चालकांनी संप केला तर... बरं हा नुसताच संप नाही तर त्यामुळे कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूड्यु यांना चक्क ओटावा या राजधांनीतल्या त्यांच्या घरातून सुरक्षा कारणासाठी दुसर्‍या सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. होय तुम्ही हे वाचता आहात हे खरं आहे.

झालय असं की, कॅनडा मध्ये अन्न, जीवनावश्यक वस्तु, इतर गोष्टींसाठी तिथल्या नागरिकाना अमेरिकेवर अवलंबून राहावं लागतं. अमेरिकेतून रस्त्याच्या मार्गाने हे ट्रक्स कॅनडात आवश्यक वस्तूंची ने आण करत असतात, त्यामुळे हीच त्यांची लाइफलाइन आहे, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ट्रक कॅनडातून अमेरिकेत जातात तिथून माल घेऊन परत कॅनडात येतात... असं हा नित्यनियमाचा उपक्रम चालू असतो...

कॅनडा हा अमेरिकेचा शेजारी... दोघांमध्ये एक सीमारेषा आहे. कॅनडा- अमेरिका यांचे मैत्रीपूर्ण व सौहार्दाचे संबंध आहेत. कॅनडा हा अमेरिकेचा मित्र राष्ट्र आहे. जगभरात कोरोनाचा प्रसार होत आहे आणि त्याची झळ कॅनडासारख्या देशांनासुद्धा बसत आहे. कॅनडा सरकारने जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणार्‍या ट्रक चालकांसाठी कोरोंनासंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार ज्या ट्रकचालकानी करोना प्रतिबंधक लस घेतली नसेल आणि जे अमेरिकेतून कॅनडात परततील, त्यांना  नियमांनुसार क्वारंटाईन व्हावे लागेल... याचा विरोध म्हणून पश्चिम कॅनडा मधल्या काही ट्रक चालकांनी एकत्र जमून याला विरोध करण्याचे ठरवलं. याचा परिपाक म्हणून ओटावा या कॅनडाच्या राजधानीत सगळे ट्रक चालक एकत्र आले... ट्रक चालक क्वारंटईन न होण्याच्या आणि लस न घेण्याच्या बाजूने आहेत. अर्थात खरं म्हणजे कॅनडातल्या एकूण लोकसंखेपैकी ८० टक्के लोकांनी लस घेतली आहे. बरं हे काही थोडं थोडकं नसून जवळपास २७०० ट्रक्सचा ताफा २९ जानेवारीला ओटावात दाखल झाला. याला फ्रिडम कोन्व्होय असं संबोधण्यात आलं. या विरोध करणार्‍या संघटनांच्या आयोजकांनुसार हा ताफा आणि जमलेले चालक हे शांततापूर्ण आंदोलन करतील आणि विरोध दर्शवतील असं सांगण्यात आलं आहे... पण ओटावा पोलिस दलाच्या प्रमुखांनुसार यामध्ये देशविघातक शक्तिसुद्धा दाखल झाल्या आहेत आणि हे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे, हिंसाचार होऊ शकतो... त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधान ट्रूड्यु यांचा जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो अशी शक्यता आहे, त्यामुळे कुठलीच रिस्क न घेता सरळ पंतप्रधंनांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

हे कमी म्हणून की काय, ट्रकचालकांना आता कॅनडातल्या शेतकर्‍यांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे आणि ते पण त्यांच्या ट्रॅक्टरसकट विरोध प्रदर्शनात सामील झाले आहेत. काही ट्रक चालकांचा तर जो पर्यन्त कॅनडा सरकार कोविड लसीकरणाचे घेतलेले निर्णय मागे घेत नाही तोपर्यन्त ते तिथेच ठिय्या मांडून बसणार आहेत असं सांगितलं. पार्लियामेंट हिल या कॅनडाच्या संसदेजवळ हे ट्रक चालक निदर्शनं करण्यासाठी एकत्र आले आहेत आणि ते तिथेच त्यांच्या त्यांच्या ट्रकमध्ये राहणार आसल्याचंसुद्धा सांगितलं आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार अति उजवे गट आणि त्यांचे पाठीराखे या निदर्शनात घुसले आहेत आणि त्यांच्यामुळे धोका उत्पन्न होण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे सगळे खबरदारीचे उपाय घेत आहेत. सदध्या कॅनडात उदारमतवादी पक्षाचं सरकार आहे, तर ऊजवे पक्ष विरोधक आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार अति उजव्या गटांचा या मोर्चात सहभाग वाढल्याने त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात...

एक अत्यंत महत्वाची अशी नमूद करण्याची गोष्ट म्हणजे या कॅनडाच्या पंतप्रधान ट्रूड्यु यांनी काही दोन वर्षांपूर्वी भारतात चाललेल्या कृषि कायद्यांविरोधात असलेल्या मोर्चाला पाठिंबा दिला होता, तसच निदर्शनं करणार्‍या शेतकर्‍यांनासुद्धा त्यांचा पाठिंबा दर्शवला होता...  आता याच ट्रूड्युना तिथल्या जनतेच्या रोषाला तसच फ्रंटलाइन कर्मचारी आणि शेतकरी यांच्या विरोधाला सामोरं जावं लागत आहे आणि त्यांना तर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचं अधिकृत निवास सोडून अज्ञात स्थळी जावं लागत आहे. याला काय म्हणावं...!

असो... तर हा फ्रिडम कोन्व्होय किती दिवस ठिय्या मांडून बसणार आहे हे आपल्याला काही दिवसात कळेल आणि कॅनडा सरकार लसीकरणाचा आणि क्वारंटईन होण्याबद्दलचं धोरण मागे घेतं का तेसुद्धा स्पष्ट होईल.

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर फेब्रुवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...