मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीलंका आर्थिक गर्तेच्या छायेत...?

 भाग-१

कोरोना जागतिक महामारीने आज संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या प्रादुर्भावाचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवरसुद्धा खूप प्रमाणात झाला आहे. याला कुठलाही देश अपवाद नाही. याचा सगळ्यात मोठा फटका जागतिक पर्यटन क्षेत्राला बसला आहे. अश्याच आर्थिक संकटात सापडलेला देश म्हणजे भारताचा शेजारी ... श्रीलंका! श्रीलंकेची अर्थव्यवस्था हळूहळू कोसळू लागली आहे. कोविड महामारी आल्याने अंदाजे पाच लाख लोक दारिद्र्यरेषेच्या खाली गेले आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पाच वर्ष मागे फेकल्या गेल्यासारखी झाली आहे. तसच श्रीलंकेवर २६ बिलियन डॉलर इतकं परकीय कर्ज डोक्यावर आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये दीड टक्क्याने आकुंचीत पावली आहे.

श्रीलंकेच्या डोक्यावर चीनचं ५ बिलियन डॉलर कर्ज आहे. श्रीलंका हा चीनच्या कर्ज सापळ्यात अडकून पडला आहे अशी परिस्थिति आहे. याचप्रमाणे श्रीलंकन सरकारनुसार श्रीलंका एकूण तीन देशांना देणं लागतं – हे तीन देश म्हणजे चीन, जपान आणि भारत. परकीय गंगाजळी सुद्धा खूप घसरली आहे.

श्रीलंकेत पर्यटन क्षेत्राचा एकूण जिडीपी मधला वाटा हा १० टक्के इतका आहे. साहजिकच पर्यटनामुळे जे परकीय चलन पर्यटकांकडून मिळत होतं, ते तर जवळपास बंदच झालं आहे. वर्ल्ड ट्राव्हल अँड टुरिझम कौन्सिल या संस्थेच्या अहवालनुसार श्रीलंकेतल्या पर्यटन क्षेत्रामध्ये २ लाख लोकांनी आपले रोजगार गमावले आहेत.

अन्न धान्याची परिस्थिती पण अशी तशीच आहे. या सगळ्या गोष्टींचा फटका सामान्य  श्रीलंकन माणसाला बसला आहे. एकीकडे नोकर्‍या जात आहेत तर दुसरीकडे अन्न धान्य, वस्तु खरेदीसाठी सुद्धा लोकांना झगडावं लागत आहे. आर्थिक स्थिति चांगली असणार्‍या मध्यम वर्गालाही याचा फटका बसला आहे. लोक आता दिवसाला ठरवून घेतलेले अन्नचं तेवढं खात आहेत, म्हणजे अन्नाचं रेशनिंग केलं आहे. चलनवाढ झाली आहे. जे लोक दिवसातून ३ वेळा अन्न खायचे ते आता दोनच वेळा अन्न खाणार आहेत.  

खरं तर या सगळ्या नकारात्मक गोष्टींची यादी खूपच मोठी आहे. काही गोष्टींचा उल्लेख करणं इथे आवश्यक आहे. म्हणजे यावरून आपल्याला श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल कळेल. काही चमत्कारिक गोष्टी घडत आहेत याचा आपल्याला अंदाज येईल. श्रीलंका ईराण कडून तेल विकत घेतं. आता अर्थव्यवस्थेमधला रोख पैसा परकीय देणी देण्यात खर्च होऊ नये म्हणून श्रीलंका सरकार ईराणला दर महिन्याला पैसे देण्याएवजी ५ मिलियन डॉलर इतक्या किमतीचा चहा देणार आहे... थोडक्यात पैसे देण्याऐवजी, तेलाच्या बदल्यात चहा असा सगळा सौदा ठरला आहे. अशीच दुसरी चमत्कारिक आणि दु:खद गोष्ट म्हणजे लोकांना आता अन्न विकत घेणं सुद्धा बिकट झालं आहे. शहरांमध्ये ही परिस्थिति आहे. तर गावांमध्ये हालच आहेत. खेडेगावांमध्ये तर दुकांदाराकडून १ किलो दूध पावडर घेणे सुद्धा सामान्य माणसाला कठीण झाले आहे, म्हणून दुकानदार १ किलो ऐवजी दूध पावडरचे १०० ग्रॉमचे अशी १० पाकीट करून विकत आहेत. याचं कारण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे सगळं चाललेलं आहे. उद्याची शाश्वती नाही.

श्रीलंकन सरकारला कोण वाचवेल, कोण या आर्थिक गर्तेतून बाहेर काढेल हे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. सरकारला आता आंतर्राष्ट्रीय नाणेंनिधीकडून मदत घेण्याची आवश्यकता आहे असं श्रीलंकेचे मंत्री सांगत आहेत. श्रीलंका सरकारने अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिति पाहून लष्कराच्या हातात काही कामकाज दिले आहे. सरकारने सैन्यातल्या एका जनरल पदाच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे जीवनावश्यक वस्तु, अन्न धान्याचे वाटप करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे... पण त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही...

श्रीलंकेला आर्थिक मदतीची गरज आहे आणि शेजारील राष्ट्र ती करतील अशी आशा आहे॰ आगामी काळात जर श्रीलंकेला पुरेशी आर्थिक मदत मिळाली नाही तर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल अशी युद्धजन्य परिस्थिति आहे. आंतर्राष्ट्रीय नाणेंनिधी आणि आंतर्राष्ट्रीय समुदाय तसच सार्क देश यादृष्टीने काय पावलं उचलतात हे लवकरच कळेल.

                                   क्रमशः !

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...