मुख्य सामग्रीवर वगळा

कोरोना परत आलाय... चीनमध्ये!

 ही गोष्ट आहे २३ डिसेंबर २०२१ची. उत्तर चीनमधल्या शांक्सी विभागातल्या शियान शहरात अचानक एकच धावपळ सुरू झाली. चीनी सरकारी अधिकार्‍यानी फरमान काढलं- शहरातल्या सर्व म्हणजे १ कोटी ३० लाख नागरिकांनी घराच्या बाहेर अजिबात पडू नये... कारण कोरोना या जीवघेण्या रोगाचा फैलाव होतो आहे... यावेळी वेळीच उपाय नाही केले तर खूप गंभीर परिणामांना सगळ्यांना सामोरे जावं लागेल...

  चीनमध्ये साम्यवादी सरकार असल्यामुळे आणि चीनी सरकारचं माध्यमांवर नियंत्रण असल्यामुळे बातमी खरी असली तरी ती कितपत खरी आहे याबद्दल साशंकता निर्माण होऊ शकते. अर्थात आकडे बदललेले असतील पण परत कोरोना मूळ धरू पाहतोय की काय अशी परिस्थिती आता चीनमध्ये आहे. ज्याप्रमाणे आपण सहजरीत्या फेसबुक वापरू शकतो, आपली मतं मांडू शकतो, विरोध करू शकतो, हरकत घेऊ शकतो (कारण आपल्याकडे लोकशाही आहे)... चीनमध्ये अशी परिस्थिती नाही... याचं कारण चीनला आपल्या नागरिकाना स्वातंत्र्य मिळू द्यायचा नाही... आणि सध्याच्या शी जिनपिंग यांच्या सरकारने ती पुरेपूर खबरदारी घेतली आहे. विषय आहे चीनमध्ये कोरोना परतण्याचा! अर्थातच चीनी सरकारला खरी माहिती उजेडात येऊ द्यायची नाही, असाच अर्थ यातून निघतो.

  गम्मत म्हणजे काही वृत्तवाहिन्या या व्हायरसला कोरोना व्हायरस न म्हणता वुहान व्हायरस म्हणतात. म्हणजे वुहान या शहरातून, तिथल्या प्रयोगशाळेतून हा व्हायरस सगळ्या जगभर पसरला आणि त्याचे परिणाम सगळी मानवजात भोगते आहे असा एक ठाम समज आहे. असो. तर विषय आहे कोरोना परतण्याचा... जसं जगभर सोशल मीडिया म्हणून सगळीकडे फेसबुक सर्वत्र वापरलं जातं त्याप्रमाणे चीनमध्ये फेसबुक वापरलं जात नाही याचा कारण चीनमध्ये फेसबुक या आणि इतर सगळ्या जागतिक मीडियाच्या वापरास बंदी आहे.  चीनमध्ये फेसबुकप्रमाणे वाईबो (Weibo) ही साईट स्थानिक चीनी नागरिक वापरतात॰ अर्थातच चीनी सरकारचं कडक नियंत्रण या साइटवर आहे. वाईबोला सरकारी वेबसाइट असं म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही अशी परिस्थिती आहे.

  मात्र तुम्ही फार काळ जनतेला वेठीस धरू शकत नाही ही खरी गोष्ट आहे. चीनच्या शियान मधले नागरिक आता आवाज उठवू लागले आहेत असे चित्र आहे. नागरिकांनी तिथल्या सामाजिक माध्यमांवर आपल्या कैफियती मांडल्या. काहींनी फोटो टाकले. २३ डिसेंबर पासून सगळ्या नागरिकाना घरी बसायचे आदेश जारी केल्यामुळे त्यांची खूपच तारांबळ उडाली आहे. लोकांकडे खायला अन्न नाही. बाहेर तर पडू शकत नाही. चीनी अधिकार्‍यानी अन्नधान्याचा मोफत पुरवठा केला असून ते वाटण्यात येत आहे असं सरकारचं म्हणणं आहे. परिस्थिती तर इतकी गंभीर आहे की लोक चक्क वस्तुविनिमय (Barter) पद्धतीने रोजचं जीवन जगत आहेत. सिगरेटच्या बदल्यात कोबी, भांडीधुण्याच्या साबणाच्या बदल्यात सफरचंद, तर आपल्या व्हिडिओ गेमच्या बदल्यात नूडल्स असले भलतेच व्यवहार नागरिकाना करावे लागत आहेत. म्हणजे मध्ययुगीन परिस्थिती आहे की काय अशी शंका यावी.

  काही बातम्यांनुसार शियान इथल्या स्थानिक प्रशासनाने अन्नधान्याचे संकट उभे राहू नये, तसच लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून अन्नधान्याचे पॅकेट्स तयार करण्याचे आणि ते पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. जर व्यवस्था भक्कम असती तर लोकांनी तक्रारी केल्या नसत्या... पण तसं दिसत नाही.

  ओमायक्रोनचं थैमान सुरू आहे. अशी परिस्थिती असताना चीन सगळ्या जगाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे याची चीनलासुद्धा कल्पना नसावी...

 यावर उपाय ? आपण आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढवूयात, व्यायाम करूयात, आणि आपल्या सरकारने कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि काय करू नये हे सांगितल्यानंतर त्याचं तंतोत्तांत पालन करुयात आणि सुरक्षित राहूयात एवढंच आपण करू शकतो.

  चीनने हे संकट उभं केलं आहे आणि त्याचा त्रास जगाला होतो आहे... याचा विचार चीनी सरकार करेल अशी अशा बाळगणंच आपल्या हाती आहे...

-निखिल कासखेडीकर 

(https://kfacts.in/ या पोर्टल वर हा लेख जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)    

(

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...