मुख्य सामग्रीवर वगळा

चीनची दडपशाही!

चीन...म्हणजे उगवती महासत्ता. चीन...म्हणजे ड्रॅगन चा प्रदेश. चीन... म्हणजे एक सशक्त लष्करी आणि आर्थिक ताकद. खर म्हणजे चीनला विशेषणे देऊ तेवढी थोडीच. हॉलीवूड किंवा बॉलीवूडपटात आपण जे कुन्गफू कराटे पाहतो, ती देणगी सुद्धा चीननेच जगाला दिली आहे. अश्या एक ना विविध चीनच्या छटा. खुद्द अमेरिकेलाही ज्याची भीती वाटते असा हा चीन.



पण... विविध रंगी चीनच्या जश्या चांगल्या छटा आहेत, तश्याच काही खटकणा-या गोष्टीसुद्धा आहेत. याचे कारण चीनच्या राजकीय प्रणालीत दडले आहे. तसा चीन हा राजकारणात साम्यवादी विचारसरणी पाळणारा देश आणि यामुळेच चीनने साम्यवादी विचारांच्या विरुद्ध लढणाऱ्या लोकशाहीवादी गटांना, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या अनेक लोकांना मुख्य प्रवाहात आणू न देण्याचे अनेक उद्योग केले आहेत आणि आताही तेच विनाखंड चालू आहे. चीनच्या साम्यवादी राज्यव्यवस्थेच्या विरुद्ध एक शब्दही जरी उच्चारला तरी तुरुंगाची हवा खावी लागेल अशी व्यवस्थाच जणू चीनी सरकारने केली आहे. याचे उदाहरण म्हणजे चीनी सुरक्षा दलांनी देशभर मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या तीनशेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची केलेली चौकशी आणि धरपकड. बरं ह्यातले बरेच कार्यकर्ते हे कोणी साधेसुधे  नाहीत तर प्रत्यक्षात मानवी हक्कांसाठी लढणारे उच्च शिक्षित वकील आहेत.

जगांत शुद्ध साम्यवाद अंगीकारून वाटचाल करणारे फार थोडे देश बाकी राहिले आहेत, त्यात चीनचा समावेश होतो. पण चीन हा तसा पूर्ण साम्यवादी नाही, कारण चीनी अर्थव्यवस्था भांडवलवादाला प्राधान्य देणारी आहे. म्हणून राजकीयदृष्ट्या चीन डावा आहे तर आर्थिक दृष्ट्या उजवा आहे. पण चीन मानवी हक्कांच्या सुरक्षेबाबत फारच उदासीन आहे. चीनबद्दल अजून एक आक्षेप असा घेतला जातो कि चीन अधिप्रमाणित देश नाही, म्हणजे चीनवर आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.

चीनवर मानवी हक्कांच्या पायमल्लीसंदर्भात आतापर्यंत अनेक आरोप झाले आहेत. मुळातच चीनमध्ये पी.आर.सी कॉन्स्टीट्युशन (Peoples Republic of China Constitution) हे सर्वोच्च मानले जाते. अगदी नागरिकांना देण्यात आलेल्या अधिकारांपेक्षाही सर्वोच्च आणि इथेच सगळा घोळ होतो. अमेरिकादी देशांनी अनेक वेळा या संदर्भात चीनकडे तक्रारी केल्या आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागापासून ते अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इत्यादींनी अनेकवेळा मानवी हक्कांसादर्भात चीनी सरकारकडे पाठपुरावा केला आहे आणि तीव्र नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे, पण चीन या कोणालाही जुमानत नाही. ही नाराजी व्यक्त करणा-यांमध्ये अनेक देशांची सरकारेही आघाडीवर आहेत. चीनमध्ये मानवी हक्कांसंदर्भातले विषय हे खूपच महत्वाचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने ‘एकच मूल’ हे धोरण, तसेच ‘देहांताची शिक्षा’,‘चीनी वृत्तपत्रस्वातंत्र्य’, आणि ‘तिबेटची राजकीय आणि कायदेशीर स्थिती’ हे गुंतागुंतीचे विषय आहेत. नि:पक्षपाती न्यायसंस्थेचा अभाव हे चीनी व्यवस्थेचे अजून एक वैशिष्ट्य.

चीनी डाव्या सरकारचा दरारा इतका आहे कि लोकशाहीवादी गट हे सरकारला घाबरून आहेत. मग या गटांना आणि लोकांना भूमिगत राहून काम करावे लागते. कारण पकडले जाण्याची भीती आणि एकदा का पकडला गेला आणि सरकारने निर्माण केलेल्या संविधानाच्या विरोधात जर तो गेला तर मग त्याची काही खैर नाही. मग तर तुरुंगात रवानगी निश्चित आणि जिवंत सहिसलामत बाहेर पडणे तर महाकठीण काम.


मागील वर्षी चीनी सरकारने या सर्व मानवी हक्क कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायचे ठरवले. आणि आजतागायत सरकारचा हा उपक्रम चालू आहे. याची कटू आठवण म्हणजे तियान्नमेन चौकात जमलेल्या निदर्शाकांवरचा पाशवी हल्ला. मागील वर्षापासून अनेक कार्यकर्ते तुरुंगात आहेत. याबाबत अधिकृत माहिती चीन दडवत आहे. वेळेप्रसंगी खुद्द आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अधिकार्यानाही विमानतळावरूनच परत पाठवण्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. पण चीनी सरकारला हे कळत नाही की आपल्याच नागरिकांवर आपण जो अन्याय करतो आहोत तो एक दिवस आपल्याच अंगाशी येईल. चीनी सरकारला सगळ्यात मोठा धोका जाणवतो तो म्हणजे चीनमध्ये जर लोकशाही अस्तित्वात आली तर काय होईल याचा. या सगळ्यासाठी हा खटाटोप चालू आहे. पण चीनची ही दडपशाही फार काळ चालली तर मात्र जनतेत असंतोष निर्माण होईल आणि याची परिणीती चीनमध्ये लोकशाहीवादी राज्य येण्यामध्ये होईल, हे मात्र नक्की. त्यामुळे चीनने वेळीच शहाणपणा शिकणे अधिक योग्य होईल


- निखील कासखेडीकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...